अहमदनगर : अमली पदार्थांचा २८ वर्षांचा साठा नष्ट

गुन्ह्यांचा मुदतीत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केले
पोलिस
पोलिसsakal

अहमदनगर : जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत गेल्या २८ वर्षांपासून (सन १९९४ ते २०१६ पर्यंत) विविध ३२ गुन्ह्यांतील ७९८ किलो १०८ ग्रॅम गांजा, भांग, गर्द न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी नष्ट केला. रांजणगाव (जि. पुणे) एमआयडीसी येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपअधीक्षक (गृह) संजय नाईक पाटील, एलसीबीचे निरीक्षक अनिल कटके आदी उपस्थित होते.

अमली पदार्थविरोधी कायदा, १९८५ अन्वये जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल १९९४ ते २०१६ दरम्यानच्या ३२ गुन्ह्यांत एकूण ७९८ किलो १०८ ग्रॅम गांजा, भांग, गर्द साठा जप्त करण्यात आला होता. या गुन्ह्यांचा मुदतीत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केले. नियमित सुनावणी होऊन न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाने मुद्देमाल नष्ट करण्याबाबत आदेश दिले होते. पोलिस अंमलदार विष्णू घोडेचोर, भाऊसाहेब कुरुंद, सखाराम मोटे, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, जयराम जंगले, भरत बुधवंत, बबन बेरड यांनी ही कार्यवाही पूर्ण केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com