रस्त्याचे काम सुरु असताना ३२ गावांना जोडणारी जलवाहीनी उध्वस्त

Aquifers of 32 villages destroyed during road works
Aquifers of 32 villages destroyed during road works

अकोले (अहमदनगर) : गाव पाणी योजना पाईप लाईन रस्त्याच्या ठेकेदाराने उध्वस्त केल्याने माजी आमदार वैभव पिचड यांनी ठेकेदाराचे कान टोचत भविष्यात चुका होणार नाही, याची समज दिली.

कोल्हार घोटी राज्य मार्गाचे इंदोरी फाटा येथे काम सुरु असतांना शेतकऱ्यांच्या पाईपलाईनचे (३२गाव पाणीपुरवठा योजनेचे पाईप) मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. याबाबतची माहीती शेतकऱ्यांनी माजी आमदार पिचड व माजी मंञी मधुकरराव पिचड यांना दिली. 

माहिती मिळताच पिचड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ३२ गाव पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी, रोडचे मक्तेदार यांना समक्ष बोलवुन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे व गाव पाणीपुरवठा योजनेच्या पाईपचे दुरुस्ती करणे बाबतच्या सुचना दिल्या. तसेच येथुन पुढे नुकसान होऊ नये म्हणुन काळजी घ्यावी, असे सांगितले.

बी. आर. काकडे (कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग) : रस्ते काम सुरू असताना ३२ गाव पाणी योजनेचे नुकसान झाले. संबधित ठेकेदार यांनी ते काम पूर्ववत करून देण्याचे मान्य केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com