पुणेवाल्यांची पुन्हा दादागिरी! कुकडीच्या पाण्यामुळे पाचपुते आक्रमक

सरकारने न्यायालयाला महत्त्व पटवून द्यावे
बबनराव पाचपुते
बबनराव पाचपुतेई सकाळ

श्रीगोंदे : कुकडी प्रकल्पातील डाव्या कालव्यातून आवर्तन सोडण्याचे नियोजन झाले. मात्र, न्यायालयाने पिंपळगावजोगे धरणातील अचलसाठा सोडण्यात तुर्त स्थगिती दिली. त्यामुळे आवर्तन पुढे जाणार आहे. मात्र, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता सरकारने या भागातील लोकांसाठी हे पाणी किती महत्वाचे आहे हे वास्तव सांगून पाणी सोडण्याची जबाबदारी घ्यावी. सरकार कमी पडल्यास कोरोना संकट असले तरी आंदोलनाची आम्हाला सवय आहेच आमचा संयम पाहू नये, असा सणसणीत इशारा आमदार बबनराव पाचपुते यांनी सरकारला दिला.

बबनराव पाचपुते
अॉक्सीजन लेव्हल ३६, बेडही मिळेना; तरी आजीबाई झाल्या ठणठणीत

पाचपुते म्हणाले, कुकडी प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचेच नियोजन करुन त्यातून फळबागांचे भरणे करावे असे मला वाटत होते. त्याबाबत मंत्री व अधिकाऱ्यांशी बोललोही होतो. मात्र शेतीचे नियोजन करुन ठेवले. आता पिंपळगाव जोगे धरणातील अचलसाठा सोडण्याला विरोध करणारी याचिका दाखल झाली आणि या पाण्याला न्यायालयाने तुर्त स्थगिती दिली.

पुण्यातील लोकांची पुन्हा दादागिरी

यापूर्वीचे जे झाले ते बाजूला ठेवून आता डाव्या कालव्यावरील जून्नर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत व करमाळा या तालुक्यातील शेतकरी जगविण्यासाठी सरकारला तातडीने निर्णय घ्यावा लागेल. जलसंपदामंत्री जयंत पाटील, कर्जतचे आमदार रोहित पवार, पारनेरचे निलेश लंके यांच्याशी चर्चा झाली आहे.

पिंपळगाव जोगे धरणातील अचलसाठा उलचपाण्याच्या माध्यमातून घेवून तेथील शेतीला वापरण्यासाठी तरतुद झाली असल्याने त्यांची अडचण दूर होणार आहे. त्यामुळे त्यांच्या वाट्याचे पाणी त्यांना देवून उर्वरित पाणी येडगाव धरणात आणले तर डावा कालव्याचे आवर्तन सुरळीत होईल.

सरकारची थोडे दिवस वाट पाहू

सरकार काय करतेय याची आम्ही थोड्या दिवस वाट पाहतोय असे सांगत पाचपुते म्हणाले, कुकडीच्या पाण्यात राजकारण करण्याची सगळ्यांनाच गंमत वाटत आहे. शेतकरी भरडला जात असताना हे चांगले नव्हे. पाण्याबाबत चर्चा करायला अनेक समाजसेवक, नेते तयार झाले आणि ते जे सांगतील तेच खरे असे सांगत सुटले आहेत.

चाळीस वर्षे संघर्ष केलाय आम्ही

आम्ही चाळीस वर्षे याच संघर्षात मोठे झालो आहोत. त्यामुळे सगळ्यांनीच भान ठेवून चर्चा करावी. येत्या १२ मे रोजी न्यायालयात सरकारने बाजू पटवून दिली पाहिजे. काय निर्णय होतोय ते पाहू सकारात्मक निर्णय झाला नाही तर आम्ही धरण, कालवे यावर आंदोलन करू, कोरोनात घरी बसून मरण्यापेक्षा तेथे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मरण पत्करण्याची तयारी आहे.

निवेदन देऊन प्रश्न सुटत नाही

कुकडीच्या पाणीप्रश्नी एकत्र या असे सांगणारे काही नेतेच एकटेच जावून जलसंपदामंत्र्यांना भेटतात अशी खिल्ली उडवित पाचपुते म्हणाले, अगोदर कुकडीचा अभ्यास करा, अधिकाऱ्यांशी बोला, समजून घ्या आणि मग प्रश्न हाती घ्या. मात्र राजकारणात आता मोठे होण्याची स्वप्ने यांना पडून लागल्याने मंत्र्यांना निवेदने देवून त्याचे फोटो व्हायरल केले म्हणजे कुकडीचा प्रश्न सुटला असा समजणाऱ्यांनी तालुक्याला ओळखले नसल्याचे लक्षात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com