ऊसतोड न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

ऊसतोडणीचा हंगाम संपत आला असल्याने तोड मिळण्यासाठी त्यांनी साखर कारखान्याकडे चकरा मारल्या
Farmer commits suicide due to non receipt of sugarcane ahmednagar
Farmer commits suicide due to non receipt of sugarcane ahmednagarsakal

शेवगाव : उसाला तोड मिळत नसल्यामुळे हतबल होऊन शेतकऱ्याने आत्महत्या केली. जनार्दन सीताराम माने (वय ७०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी (ता. ५) तालुक्यातील जोहरापूर येथे ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. जोहरापूर येथील जनार्दन माने यांचा पावणेतीन एकर ऊस खामगाव शिवारात आहे. गेल्या वर्षी आलेल्या पुरामुळे माने यांचा ऊस बाधित झाला होता. ऊसतोडणीचा हंगाम संपत आला असल्याने तोड मिळण्यासाठी त्यांनी साखर कारखान्याकडे चकरा मारल्या.

मात्र, तोड मिळत नसल्याने हतबल झालेल्या माने यांनी मंगळवारी (ता. ५) दुपारी दोनच्या सुमारास ऊस पेटवून देत शेतात विषारी औषध प्राशन केले. त्यांना तातडीने शेवगाव येथील नित्यसेवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान बुधवारी (ता. ६) त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे, असा परिवार आहे.

शेवगाव तालुका चार कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात असतानादेखील शेतकऱ्यांच्या उसाला तोड मिळत नाही. तोडणीसाठी कारखान्याकडे वडिलांनी खूप चकरा मारल्या. मात्र, यश न आल्याने हतबल होऊन हा टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोप मुलगा संतोष माने यांनी केला. याबाबतचा जबाब पोलिस ठाण्यात नोंदविला आहे. पुढील तपास रामेश्वर घुगे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com