दहावी-बारावीच्या प्रश्नपत्रिका जाळल्या की जळाल्या? विखे
शिर्डी : दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणा-या टेम्पोला लागलेली आग ही गंभीर घटना आहे. प्रश्नपत्रिका जाळल्या की जळाल्या, याची उच्चस्तरीय चौकशी केली जावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
ते म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारच्या काळात भरतीप्रक्रियेसाठी कोणतीही परीक्षा पारदर्शकपणे झाली नाही. सर्वच परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार वारंवार घडले. परीक्षा संशयाच्या भोवऱ्यात अडकल्या. दहावी- बारावीच्या परीक्षा तोंडावर आल्या असताना, प्रश्नपत्रिका घेऊन जाणा-या टेम्पोला आग लागणे ही गंभीर बाब आहे.
काल परीक्षा मंडळाने तांत्रिक कारण सांगून तारखा पुन्हा नव्याने जाहीरदेखील केल्या. मात्र, यातील नेमके तांत्रिक कारण कोणते, हा प्रश्न अनुत्तरित आहे. एकीकडे कोविड संकटाने सर्वाधिक नुकसान शिक्षण क्षेत्राचे झाले. सरकार स्वत:चेच निर्णय मागे घेत राहिले. शाळा सुरू करण्यापासून ते दहावी-बारावीच्या परीक्षांच्या बाबतीतही त्यांनी ठाम भूमिका घेतली नाही. त्यामुळे पालकांची चिंता सतत वाढत राहिली. कॉंग्रेसला आपली प्रतिमा सुधारायची असेल, तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.