जिल्ह्यात शाळांना प्रतिसाद अल्पच

फक्त २११ शाळा झाल्या सुरू
ahmednagar
ahmednagarsakal

अहमदनगर : कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर राज्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या. आता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र जिल्ह्यात सध्या फक्त २११ शाळाच सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे शाळांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अल्पच मिळात असल्याचे यावरून दिसून येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य सरकारच्या सूचनेनंतर राज्यभरातील कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वर्षी १५ जुलैपासून आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात आठवी ते बारावीच्या एक हजार २४२ शाळा आहेत.

त्यामध्ये ८६ जिल्हा परिषदेच्या व उर्वरित एक हजार १५७ अनुदानित, विना अनुदानित शाळा आहेत. त्यातील फक्त २११ शाळा सध्या सुरू आहेत. त्यामध्ये १७ हजार विद्यार्थी उपस्थित राहात आहेत. जिल्ह्यात शाळा १५ जुलैला सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी १४९ शाळा सुरू झालेल्या होत्या. त्यात वाढ होऊन सध्या फक्त २११ शाळा सध्या सुरू आहेत.

तालुकानिहाय शाळा

  1. अकोले - ४३

  2. संगमनेर - २7

  3. कोपरगाव - चार

  4. राहाता - ३३,

  5. राहुरी - आठ

  6. श्रीरामपूर - २१

  7. नेवासे -१६

  8. शेवगाव - १२

  9. नगर - आठ

  10. पारनेर - सहा

  11. श्रीगोंदे - चार

  12. कर्जत - सहा

  13. जामखेड - तीन

कोरोनाने पुन्हा शाळा बंद

जिल्ह्यातील काही गावांमध्ये शाळा सुरू करण्यात आलेल्या होत्या. मात्र कोरोनाचे रुग्ण गावामध्ये सापडल्यानंतर शाळा बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. तसेच काही गावांतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने अद्यापही शाळा सुरू झालेल्या नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com