श्रीगोंदे : शहरात कोरोनाची रुग्णसंख्या पन्नासच्या घरात गेल्याने तीन दिवस लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगराध्यक्ष, व्यापारी व प्रमुख नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उद्यापासून (मंगळवार) पुढचे तीन दिवस शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय झाला.
ही माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांना दिल्यानंतर, त्यांनीही शहरातील सर्व सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या आता प्रशासनासह नागरिकांसाठी धोक्याची घंटा होऊ पाहत आहे. काल एकाच दिवशी सोळा रुग्ण आढळले. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्याने पन्नाशी ओलांडल्याने प्रशासनापूर्वीच व्यापारी व नागरिकांनी "बंद'साठी पावले उचलली. यात नगरपालिकेने पुढाकार घेतल्यावर निर्णय झाला.
हेही वाचा - संगमनेरात घरात शिरले पाणी...लोक पळाले छतावर
बाबासाहेब भोस, मनोहर पोटे, अशोक खेंडके, महावीर पटवा, आनंद कटारिया यांनी हा निर्णय घेतला. नगराध्यक्ष शुभांगी पोटे म्हणाल्या, की शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे काही दिवस शहर बंद ठेवण्याबाबत सर्वांचेच एकमत झाले. त्यामुळे उद्यापासून तीन दिवसांचा "बंद' ठेवला जाईल. यात रुग्णालये, औषधे, दूध व पाणी याच अत्यावश्यक बाबी सुरू राहतील. किराणा व भाजीपालाही बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे.
शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे. वरिष्ठांना त्याबाबत कल्पनाही दिली आहे. तालुक्यातील लोकांची वर्दळ शहरात होऊ नये, यासाठी येथील सगळी सरकारी कार्यालये तीन दिवस बंद राहतील.
- महेंद्र माळी, तहसीलदार, श्रीगोंदे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.