अहमदनगर जिल्ह्यात २१ टॅंकरने पाणी पुरवठा

water tanker
water tankersakal

अहमदनगर : जिल्ह्यातील चार तालुक्यांतील काही गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या जिल्ह्यातील चार तालुक्यांतील टंचाईग्रस्त गावांतील ४० हजार लोकसंख्येला २१ टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

मागील वर्षी पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाई सध्या चांगली आहे. परंतु आता उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई सध्या निर्माण होऊ लागली आहे. जिल्‍ह्यातील सध्या नगर, अकोले, संगमनेर व पारनेर तालुक्यातील काही गावे व वाड्यांना टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

एकूण २१ टॅंकरच्या माध्यमातून ७० टॅंकर खेपा करून ४० हजार लोकांची तहान भागविली जात आहे. मागील पंधरवड्यात जिल्ह्यातील टॅंकरची संख्या कमी होती. मात्र, आता ती वाढू लागली आहे. त्यात आगामी काळात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या काही गावांमधून पाण्याचे टॅंकर सुरु करण्यात यावे, यासाठी ठराव करून ते पंचायत समितींकडे पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तर काहींनी आपले प्रस्ताव सादर केले आहेत. त्याला मंजुरी कधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मान्सून वेळेअगोदर येणार असल्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे. मात्र, मान्सून जर वेळेवर आला नाही तर टॅंकरची मागणी वाढण्याची शक्यता आहे.

तालुकानिहाय टॅंकर (कंसात खेपा)

  • नगर : ३ (१०)

  • अकोले : ३(१०)

  • संगमनेर : ११ (३७)

  • पारनेर : ४ (१३)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com