संग्रामपूर (जि.बुलडाणा) : संग्रामपूर तालुक्यातील निमखेडी येथील दोन इसमावर अस्वलाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना गुरुवार (ता.11) सकाळी 10 वाजताच्या दरम्यान घडली.
प्राप्त माहितीनुसार मेळघाट व्याघ्र प्रकल्प , अकोट वन्यजीव विभाग अकोट मधील वनपरीक्षेत्र सोनाळा मधील खडकपाणी या ठिकाणी निमखेडी येथील दोन व्यक्ती वरती अस्वलाने हल्ला केल्याने दोघांचा जागीच मुत्यू झाला . अशोक मोतीराम गवते वय 52 व माणा बंडू गवते वय 42 वर्ष हे दोन्ही रा.निमखेडी तालुका संग्रामपुर येथील आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे गाभा क्षेत्रातील खडकपाणी गेले असता त्यांचे वरती अस्वलाने हल्ला केला व त्यामध्ये त्यांचा जागीच मुत्यू झाला.
माहिती मिळताच सदर ठिकाणी वनरक्षक ए.आर.तोटे व इतर कर्मचारी पोहचले असता दोन्ही व्यक्ती मृतझाल्याचे दिसून आले . त्या दोन व्यक्तीच्या मृतदेहापासून अंदाजे 15 ते 20 मिटर अंतरावरती सुमारे 6 ते 8 महीण्याचे दोन अस्वलांची पिल्ले मरण पावल्याचे दिसुन आले . त्याचे अंगावरती कुर्हाडीने मारल्याच्या जख्मा दिसुन आल्या.माहीती मिळताच घटनास्थळावरती पोलीस स्टेशन सोनाळा पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पवार ,सचिन राठोडआणि उपवनसंरक्षक व मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट वन्यजीव विभाग अकोट हे दाखल झाले. दोन्ही मृतदेहाचा पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात वरवट बकाल येथील शवविच्छेदन करण्यात आले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.