अकाेला : महागडे बियाणे वापरूनही उगवलेच नाही. उगवलेल्या पिकाला फुल, शेंगाच लागल्या नाहीत अशा तक्रारी सातत्याने शेतकऱ्यांकडून होत आहे. त्याचा परिणाम शेतमालाचे उत्पादनावर झाला आहे.
त्याकरिता बियाण्यांसह खतांचे परीक्षण होऊन शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे, खत मिळावेत यासाठी कृषी विभागाच्यावतीने प्रत्येक वर्षी बियाणे, खत तपासण्याची मोहीम राबविण्यात येते.
मागील वर्षीही घेतलेल्या सहा कंपन्यांचे बियाण्यांचे नमुणे अप्रमाणित आढळले आहे.
बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याची प्रकरणे गेल्या काही वर्षांत उघडकीस आली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या हंगामात जिल्हा परिषद कृषी विभागाने किटकनासके व बियाण्यांची तपासणी करताना गांभिर्याने कारवाई केली.
हेही वाचा - बर्ड फ्ल्यूचा धोका; ३५० पक्षांचे नमुने निगेटिव्ह
त्यात जिल्ह्यात वर्षभरात उगवण क्षमता कमी असलेले १६ बियाण्यांचे नमुणे आणि तीन किटकनाशकांचे बियाणे अपात्र ठरले आहे.
जिल्हा परिषद कृषी विभागाकडून बीटी कपाशीच्या वाणाचे दोन नमुने घेण्यात आले हाेते. अकाेट राेडवरील गोदामातून घेण्यात आलेल्याया नमुन्यांची तपासणी करण्यासाठी प्रयाेगशाळेत पाठविण्यात आले होते.
त्यात जादा जीन आढळून आले. याबाबत कंपनीने कृषी विभागाकडे खुलासा सादर केला हाेता. मात्र खुलासा समाधानकाक नव्हता. परिणामी न्यायालयात खटलेही दाखल करण्यात आले हाेते.
(संपादन - विवेक मेतकर)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.