
गेल्या आठवड्यापासून मोसमातील निच्चांक तापमानासह जिल्ह्यात कडाक्याची थंडी पसरली आहे. पुढील दोन आठवड्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता असून, शीतलहरीचा फळपिकांवर विपरित परिणाम पडून मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे पूर्वदक्षतेसह नियोजित उपाययोजना करणे आवश्यक असल्याचा सल्ला कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ प्रा. गजानन तुपकर यांनी दिला.
अकोला : गेल्या आठवड्यापासून मोसमातील निच्चांक तापमानासह जिल्ह्यात कडाक्याची थंडी पसरली आहे. पुढील दोन आठवड्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता असून, शीतलहरीचा फळपिकांवर विपरित परिणाम पडून मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे पूर्वदक्षतेसह नियोजित उपाययोजना करणे आवश्यक असल्याचा सल्ला कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ प्रा. गजानन तुपकर यांनी दिला. किमान तापमान १० अंश सेल्सिअस पेक्षा कमी होत असल्याचा विपरित परिणाम संत्रा, मोसंबी, लिंबू, केळी, पपई इत्यादी फळबागांमध्ये दिसून येतो. फळझाडांची कार्यशक्तीसुद्धा कमी होते. हेही वाचा - गोळीबाराने हादरले शहर; वाढदिवसाच्या दिवशीच घटला थरार, गोड्या झाडून लुटली रक्कम त्यापेक्षाही तापमान कमी झाले, तर झाडांच्या पानांना इजा होऊन ती वाळल्यासारखी दिसतात, फळांना भेगा पडतात, फळे काळी पडतात. खोड तसेच फांद्यांचा मध्यभाग काळपट होतो. परंतु, बाहेरील साल सूस्थितीत असते. काही वेळा खोडाची जमिनीलगतची साल फाटते. अति थंडीमुळे पेशींतील पाणी गोठल्यामुळे पेशी फाटतात तसेच मुळांनासुद्धा तडे जातात. ही स्थिती लक्षात घेता फळझाडांची थंडीच्या कालावधीत योग्य पद्धतीने काळजी घेणे आवश्यक आहे. हेही वाचा - हे तर नवलंच! सातपुड्यातील ‘तेल्यादेवाला’ लागते तंबाखू, बिडी आणि सिगारेटही, जाणून घ्या रंजक कहाणी पूर्वदक्षतेचे उपाय हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा नियंत्रणाचे उपाय हेही वाचा - झेडपीचे शिक्षक कंत्राटी होणार, १५२ शिक्षकांवर कारवाई छप्पर करण्यासाठी काळ्या पॉलिथिनचा वापर करावा. रात्रीच्या वेळी फळबागेत जागोजागी ओला पालापाचोळा पेटवून धूर करावा. शिफारशीत प्रमाणात पालाशयुक्त वरखतांची (म्युरेट ऑफ पोटॅश) फवारणी करावी किंवा लाकडी कोळशाची राख खत म्हणून झाडांच्या आळ्यात दिल्यास झाडाची जल व अन्नद्रव्ये शोषणाची, वहनाची क्षमता वाढते. झाडांची काटकताही वाढते. अति थंडीच्या काळात झाडांवर पाण्याचा फवारा मारावा. पाण्याच्या फवाऱ्याने झाडांच्या पानांचे तापमान योग्य राहून अति थंडीपासून त्यांचे संरक्षण होण्यास मदत होते. केळीच्या घडांना बॅगचे आवरण करावे. (संपादन - विवेक मेतकर)
|
|||