संत्रा सह केळी बागावर वातावरणाचा परिणाम

akola news The effect of the environment on the banana orchard with oranges
akola news The effect of the environment on the banana orchard with oranges

बोर्डी (जि.अकोला)  ः यंदा अतिवृष्टीमुळे खरिपाच्या सोयाबीन, मूग, ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे काही दिवसात घरात येणारे उत्पन्नाचा फायदा झाला नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला. त्याचबरोबर रब्बी हंगामातील पिके घेऊन झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई काढण्याच्या मनसुब्याने शेतकरी गहू, हरभरा भुईमूग, मका, कांदा सह भाजीपाल्याचे पीक घेण्याच्या तयारीत लागला आहे. परंतु, हवामानातील बदलामुळे सुरूवातीला हरभरा पिकावर मर रोग आल्याने त्याच्याही उत्पन्नावर मोठा परिणाम झाला असल्याने, त्याचा उत्पादनावर मोठ्या प्रमाणात फरक दिसत आहे.


गेल्या आठवड्यापासून परिसरात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे त्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. गेल्या खरीप हंगामातही कपाशी पिकावर आलेली बोंड अळी, लाल्या रोग, मूळ, कुजवा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस उत्पादनातही मोठी घट दिसून येत आहे. कापूस वेचणीचा आणि शेतातून घरापर्यंत वाहतूक खर्च आणि मजूरी वाढली, बाजारपेठत अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी चांगलेच नाराज होत आहे.

एकरी खर्चाचे प्रमाण विचारात घेतले, तर त्याचे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे. खर्चाची ताळमेळ बसवताना हाती येणारे निव्वळ उत्पन्न शून्य अशी अवस्था आहे. त्यामुळे कुठ पीक, तर कुठ कोरडी जमीन दिसत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. कीड आणि अळीचे दिवसेंनदिवस अतिक्रमण वाढत चालल्याने हेही पीक हातचे जाते का? असा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

अशा विविध रोगापासून पिकाचे संरक्षण करत नाही, तोच परिसरात वन्य प्राण्यांचा हैदोस पण शेतकऱ्यांना शांततेत झोपू देत नाही आहे. रात्रीच्या वेळी उभ्या पिकांना फस्त करतण्याचा कारणामा वन्यप्राणी करत आहेत. त्यामुळे हवामानाचा फटका सर्वात जास्त हरभरा उत्पादकांना सहन करावा लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. फळपीक समजल्या जाणाऱ्या संत्रा सह केळी ला ही बदलत्या वातावरणाचा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. शासनाकडून काही मदत मिळण्याची अपेक्षा स्थानिक शेतकऱ्यांना आहे.
----------------------
अकोट तालुक्यातील काहीच भागात ओलीताची शेती आहे, त्यामुळे ठोक पीक म्हणून संत्रा पिकाची लागवड केली. मात्र, गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे संत्रा पिकाचे हस्त आणि आंबिया हे दोन्ही बहार अडचणीचे ठरत आहेत. पिकाला ढगाळ वातावरण आणि अवकाळी हे दोन्ही बादक ठरत आहेत, तरी शासनाने संत्रा उत्पादन शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
-राहुल बोंडे, स्थानिक शेतकरी.
----------------------------
यंदा सुरुवातीला अति पावसामुळे खरिपातील कापसासह इतरही पिके हातून गेले. आता दुसरा पर्याय म्हणून अनेक शेतकऱ्यांनी कपाशी उपटून पाण्याची उपलब्धता पाहुन हाती पैसा नसतानाही जमेल त्या परिस्थितीत गहू आणि हरभरा पिकाची पेरणी केली. मात्र, अवकाळी पावसामुळे त्यालाही फटका बसला. आता केळी च्या पिकावर आशा आहे.
-रमेश अकोटकर, शेतकरी
-----------------------
यंदा होत असलेल्या हवामान बदलामुळे आणि अवकाळी पावसामुळे संत्रा पिकाचा आंबिया बहारावर मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आंबिया बहार हा जवळजवळ गळाला आहे. त्याचप्रमाणे केळीवर सुद्धा करपा येवून पाने पिवळी पडत आहेत. कांदा, गहू, हरभरा सारखे पिके सुद्धा बुरशी रोगाच्या कच्याट्यात सापडले आहेत.
-गजानन धर्मे, शेतकरी, अकोली जहागीर.
--------------------
अवकाळी पाऊस आणि अचानक वाढलेले तपमान, ढगाळ वातावरणाणे एकूणच रब्बीतील पिके आणि भाजीपाला धोक्यात आला असून, याचा मोठ्या प्रमाणात पिकावर आणि त्याच्या वाढीवर वाईट परिणाम झाल्याने या पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रसार झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे.
-गजानन माहोलकार, शेतकरी, उमरा.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com