मूर्तिजापूर (जि.अकोला) : पंधरा हजार रुपयांची मागणी पूर्ण न केल्यामुळे सरपंच व सचिव आपल्या विधवा आईला सर्व योजनांपासून वंचित ठेवत असल्याचा आरोप या तालुक्यातील गोरेगावच्या एका मुलीने सरकार पोर्टलवर दिलेल्या तक्रारीत केला आहे. अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा दुसरीकडे ग्राम पंचायत सदस्यांच्या नातलगांना पक्के घर असूनही रमाई योजनेचा दोनदा लाभ दिल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे. सरकार पोर्टलवरील ही तक्रार निकाली काढण्याकरिता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांनी येथील गटविकास अधिकाऱ्यांकडे गेल्या ३१ ऑगस्टला पाठविली आहे. जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनिही त्या दिवशी ही तक्रार येथील गटविकास अधिकाऱ्यांना प्रथम प्राधान्याने योग्य ती कारवाई करण्यासाठी पाठाविली आहे व तात्काळ अहवाल मागविला आहे. यासंदर्भात (सध्या ग्रा.पं.ची मुदत संपून कार्यभार प्रशासकाकडे असल्यामुळे) तत्कालीन सरपंच ताई सुनिल सरदार यांना विचारणा केली असता, ‘सदर महिला आपल्याकडे आलीच नाही, त्यामुळे पैसे मागण्याचाही प्रश्न उद्भवत नाही. हा राजकीय बनाव आहे’, असे त्यांनी स्पष्ट केले. (संपादन - विवेक मेतकर) |
|||
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.