
कोरोना महामारी व त्यानंतर लागलेल्या लाॅकडाउनने अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. मात्र, वाशीम तालुक्यातील बिटोडा तेली या छोट्याशा गावातील सदाशिव राऊत या अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांने कल्पकतेने सेंद्रिय शेतीचा आधार घेत विषमुक्त भाजीपाला उत्पादनात नाव कमावले आहे.
वाशीम : कोरोना महामारी व त्यानंतर लागलेल्या लाॅकडाउनने अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. मात्र, वाशीम तालुक्यातील बिटोडा तेली या छोट्याशा गावातील सदाशिव राऊत या अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांने कल्पकतेने सेंद्रिय शेतीचा आधार घेत विषमुक्त भाजीपाला उत्पादनात नाव कमावले आहे. समाज माध्यमांच्या उपयोगितेतून घरपोच सेंद्रिय भाजीपाला विक्रीने १२ जणांच्या कुटुंबाचा डोलारा लाॅकडाउनमध्येही पेलला आहे. बिटोडा तेली या गावातील अशोक राऊत यांचा परंपरागत भाजीपाला उत्पादन करण्याचा व्यवसाय होता. बाजारात मिळणारे बियाणे खते व किटकनाशकाचा वापर करत त्यांचे उत्पादन सुरू होते. मात्र यामध्ये बहुतेक वेळेस नुकसानच हातात पडायचे. त्यात कोरोनाने कहर केल्याने उत्पादित केलेला भाजीपाला घेण्यासही कोणी तयार नव्हते. लाॅकडाउनने घराच्या बाहेर पडता येत नव्हते. त्यामुळे १२ जणांच्या कुटुंबाचे काय, असा प्रश्न निर्माण झाला. मात्र अशोक राऊत यांचा मोठा मुलगा सदाशिव राऊत याने सेंद्रिय पध्दतीने भाजीपाला उत्पादित करण्याचा निर्णय घेतला. बाजारपेठेची अडचण आल्याने सदाशिव राऊत यांनी समाजमाध्यमांवर याची माहिती देणे सुरू केले. सुरुवातीला अल्प प्रतिसाद मिळाला मात्र, भाज्यांची चव, गुणवत्ता पाहून ग्राहक वाढत गेले. सध्या दररोज पाच ते सहा क्विंटलवर भाजीपाला घरपोच विक्री केला जातो. गो-धनाची उपयुक्तता विदेशी भाज्यांचाही प्रयोग (संपादन - विवेक मेतकर) |
|||