वाशीम : गेल्या आठ दिवसात जिल्ह्यात झालेल्या अवकळी पावसाने सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र या नुकसानीचे पंचनामे शासनादेशाच्या अटीत अडकले असून, आता मदतीची आस धरलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणीही सुकून जात आहे. लोकप्रतीनिधी केवळ निवेदनाचे सोपस्कार पार पाडत असून, शासनादेशाच्या अटी शिथिल करण्यास मात्र कोणीच पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे.
या परिस्थितीत तत्कालीन भाजप सरकारने काढलेला तो शासनादेश विद्यमान परिस्थितीत गैरलागू ठरत आहे. जिल्ह्यात ६५ मिलीमीटर पाऊस झाला नसला तरी, सततच्या पावसाने अतिवृष्टीच्या पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. प्रशासनाकडे आदेश आले मात्र, निकषात बसत नसल्याने पंचनामे थांबले आहेत. आठदहा दिवसानंतर जर पंचनाम्याच्या कारवाईला सुरूवात झाली तर, पंचनामे करणार, असा तिढा निर्माण होवून शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भिती आहे.
(संपादन - विवेक मेतकर) |
|||
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.