क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले

555.jpg
555.jpg

संग्रामपूर(जि.बुलडाणा) ः तालुक्यात 15 जुलै रोजी झालेल्या पावसाने नदी ,नाला काठची शेकडो एकर शेतातील उभे पीक वाहून गेल्याने भयावह नुकसान झाले आहे. उभे पीक वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे हंगामाच्या सुरूवातीलाच मोठे नुकसान झाले आहे.  

निसर्गाची यंदा सुरुवात पासूनच शेतकऱ्यावर अवकृपा सुरू आहे. खरीप हंगाम पूर्व या भागात आदळणीचा ( जोराचा) पाऊस झाल्याने पेरणी दरवर्षी पेक्षा लवकर झाली. त्या नंतर पावसा मध्ये खंड पडला . परिणामी सोयाबीन पिकाची उगवण पासूनच  तक्रारी ची बोवणी झाली. त्या नंतर सोयाबीन पिवळे पडायला सुरुवात झाले.या मुळे यंदा चांगले उत्पन्न येईल किंवा नाही याची चिंता  शेतकरी वर्गाला लागून आहे. असे असताना 15 जुलै  चे सकाळी जोरदार पाऊस झाल्याने तालुक्यातील चार ही सर्कल मध्ये 50  मिलिमीटर चे वर पाऊस झाल्याची नोंद आहे. या मध्ये नदी नाल्यांना मोठं मोठे पूर आल्याने काठी असलेले शेत पुराच्या पाण्याखाली आले. उभ्या पिकातून पुराचे पाणी वाहल्याने कपाशी, सोयाबीन, तूर, हायब्रीड, तीळ आदी पिकाचे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान ग्रस्त शेत पीकाचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी . अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. 

असा पडला मंडळनिहाय पाऊस
मंडळ             पडलेला पाऊस(मि.मी)
बावनबीर               30
सोनाळा                   60
पातुर्डा                    25
कवठळ              58
संग्रापूर             59

मागील वर्षी एकत्रित कुटूंबातील दीड एकरात सोयाबीन पेरले पावसामुळे जागेवरच सडल्याने काहीच उत्पन्न झाले नाही . यंदा पीक बदल करून कपाशी पेरली . त्यातही नाल्याच्या पुराचे पाणी वाहून गेल्याने एकर भराचे कपाशीचे नुकसान झाले आहे.
- सुनील ठाकरे, शेतकरी बोडखा,( ता . संग्रामपूर)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com