चिमुकल्या बहिण-भावांचा धरणात बुडून मृत्यू

डांगरखेडा येथील घटना; बेलसरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर
crime
crimeSakal

अकोट (जि. अकोला) - तालुक्यातील आदिसावासी बहुल भागात असलेल्या डांगरखेडा येथे गत पाच ते सहा दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्याने सख्खे दोघे बहिण-भाऊ बाजूलाच असलेल्या चितपाणी धरणात कपडे धुणे व पाणी भरण्यासाठी गेले होते. दरम्यान, तोल गेल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.१२) दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील डांगरखेडा या गावात गत पाच ते सहा दिवसांपासून नळाला पाणी नसल्याने येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. घरी पाणी नसल्याचे पाहून डांगरखेडा येथील बेलसरे कुटुंबातील दोन चिमुकले बहिण-भाऊ पाणी भरण्यासाठी व घरातील काही कपडे धुण्यासाठी गावाच्या बाजूलाच असलेल्या चितपाणी धरणात गेले होते. काम सुरू असतानाच दोघांचाही एकाएक तोल गेल्याने धरणात बुडून दोघांचाही मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

प्रतीक्षा केशवरा बेलसरे (वय ९) व युवराज केशवराव बेलसरे (वय ६) असे मृतक बहिण-भावांचे नाव आहे. घटनेची माहिती ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार नितीन देशमुख यांना मिळताच त्यांनी सहकाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. अकोट तालुक्यात धरणाच्या पायथ्याच्या गावातच संबंधित विभागाच्या नियोजना अभावी ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांचे उदासीन धोरण सर्वसामान्य नागरिकांंच्या जीवावर उठले असल्याचे या घटनेतून सिद्ध झाले. त्यामुळे पाणीपुरवठा कसा बंद झाला? याची सकोल चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com