कोकण

पावसामुळे हापूस कलमांवरील पालवी कुजली

CD

rat26p13.jpg-
00571
राजापूर ः कलमांना येत असलेली पालवी.
-rat26p14.jpg-
00572
राजापूर ः आंबा कलमांना आलेली पालवी.
--------

पावसामुळे हापूस कलमांवरील पालवी कुजली
बागायतदार धास्तावले; डिसेंबर-जानेवारीतील मोहोरावर परिणाम शक्य
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २६ः परतीचा पाऊस लांबल्यामुळे हापूस कलमांना आलेली पालवी कुजून गेली असून त्याचा डिसेंबर-जानेवारीमध्ये येणाऱ्या मोहोरावर परिणाम होईल, अशी भिती आंबा बागायतदारांकडून वर्तविली जात आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम राहिला तर पंधरा दिवस हंगाम लांबणीवर पडेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. यंदा गणेशोत्सवात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्याचा भातशेतीला फटका बसला तरीही, आंबा हंगामासाठी हा पाऊस फायदेशीर ठरला होता. त्यामुळे हापूस कलमांना पालवी फुटली होती. ज्याचा फायदा भविष्यात आंब्याला मोहोर येण्याला होणार होता. मात्र, गणेशोत्सवानंतर काही दिवस विश्रांती घेतलेल्या वरूणराजाने मागील आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात हजेरी लावण्यास सुरवात केली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्याचा फटका आंब्यालाही बसत आहे. सतत पाऊस पडत असल्याने आंब्यांच्या झाडांना आलेली किंवा येत असलेली पालवी कुजण्याची भिती आहे. त्याचा परिणाम डिसेंबर-जानेवारीतील आंब्याच्या मोहोरावर होईल आणि मोहोर येण्याचा हंगाम तुलनेत पंधरा दिवस लांबणीवर पडेल. मोहोर लांबणीवर पडल्यास साहजिकच, त्याचा आंबा व्यवसायातून होणाऱ्या उलाढालीवर प्रतिकूल परिणाम होईल, अशी बागायतदारांना भिती आहे.

चौकट
हापूस कलमांवर तुडतुड्याचा प्रादुर्भाव
आंबा बागांमध्ये नवीन पालवी फुटू लागलेली आहे. त्यामुळे बागेतील नवीन पालवीच्या वाढीवर बागायतदारांनी निरीक्षण ठेवावे. नवीन पालवीवर तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. बागेमध्ये नवीन पालवी फुटू लागते, त्यावेळी तुड्तुड्यांच्या नियंत्रणासाठी आवश्यक औषध फवारणी करावी. काही भागात, आंबा बागांमध्ये शेंडे पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीचा प्रादुर्भाव झालेल्या झाडांवरून कीडग्रस्त शेंडे काढून त्यांचा अळीसह नाश करावा. तसेच नियंत्रणासाठी औषध फवारावे, अशा सूचना कोकण कृषि विद्यापिठाने दिल्या आहेत. पावसाचा हापूस कलमांवर होणारा परीणाम टाळता येऊ शकतो.

कोट
काही आंबा कलमांना पालवी आली आहे. काही झाडांना पालवी येण्याची स्थिती आहे. अशा स्थितीमध्ये पाऊस आल्याने ही पालवी कुजण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम येणाऱ्या मोहोरावर होणार आहे. त्यातून, यावर्षी आंब्याला मोहोर नेहमीपेक्षा पंधरा दिवस उशीरा येण्याची शक्यता आहे.
- विजय शिंदे, आंबा बागायतदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्ना ठरला बिग बॉस 19 चा विजेता, फरहाना भट्ट ठरली रनरअप

Mumbai: बीएमसीच्या प्रारूप मतदार यादीत मोठे बदल; चार वॉर्डमध्ये ५०% पेक्षा जास्त वाढ, तर २४ वॉर्डमध्ये घट

Khandala : सातारा-पुणे मार्गावर भरधाव ट्रकची अनेक वाहनांना धडक, ट्रकचालक फरार

रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक फिस्कटले! हुतात्मा, वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरला वेळेत, पण दक्षिणेकडे जाणाऱ्या ‘या’ गाड्या २ ते ३ तासांनी धावताहेत उशिराने

Nanded Drug Seizure : शिवणीत तुरीच्या ताशेत लपवलेला ‘गांजा’ उघड; पोलिसांची धाड, ₹1.60 लाखांचा मुद्देमाल जप्त!

SCROLL FOR NEXT