Ind vs Aus T20 Series SAKAL
क्रीडा

Ind vs Aus : हसरे दुःख! टी-20 संघातून वगळल्यानंतर चहलची पहिली प्रतिक्रिया! एका इमोजीमध्ये व्यक्त केली भावना

Kiran Mahanavar

Ind vs Aus T20 Series Yuzvendra Chahal : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवला कर्णधारपद देण्यात आले आहे. 23 नोव्हेंबरपासून विशाखापट्टणम येथे टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे.

वर्ल्ड कप संघात चार खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यातील श्रेयस अय्यर शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघात दाखल होणार आहे. सूर्यकुमार व्यतिरिक्त इशान किशन आणि प्रसिद्ध कृष्णाला स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर अनुभवी लेगस्पिनर युझवेंद्र चहलकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

भारतासाठी 80 टी-20 सामने खेळलेल्या चहलने संघात निवड न झाल्याने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. निवड न होऊनही त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य कायम आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये काहीही लिहिले नाही. चहलने नुकताच एक हसणारा इमोजी शेअर केला आहे. हे पाहून चाहते भावूक झाले.

त्याने कमेंटमध्ये चहलचे समर्थन केले. या फिरकीपटूने 80 टी-20 सामन्यात 96 विकेट घेतल्या आहेत. त्याने शेवटच्या 10 टी-20 सामन्यांमध्ये नऊ विकेट्स घेतल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ -

सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रशीद कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Manager Work Pressure Death: खळबळजनक! बारामतीत 'Workload'मुळे बँक मॅनेजरने बँकेतच गळफास लावून दिला जीव

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरे दोन तास एकाच हॉटेलमध्ये; भेट झाली नसल्याची सूत्रांची माहिती

BMC Election: निवडणुकीनंतर 14 गावे बाहेर काढणार; गौप्यस्फोट करत वनमंत्र्यांनी यादीच दिली

Karad News : विधीमंडळातील मारामारीप्रकरणी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांचा थेट सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले...

Rahul Gandhi: ''मोदीजी, 'त्या' पाच लढाऊ विमानांचं सत्य काय?'' राहुल गांधींकडून थेट निशाणा

SCROLL FOR NEXT