मुंबई

नवघर ग्रामस्थांची ठाम मागणी : स्थगित रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा पाली-सुधागड तहसीलदारांना निवेदन; काम थांबवणाऱ्यांवर ग्रामस्थांचा रोष, आंदोलनाचा इशारा पाली, ता. ९ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यातील नवघर गावात सुरू असलेले स्मशानभूमी जोडरस्त्याचे काम अचानक थांबवण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विरोधात नवघर ग्रामस्थांनी मंगळवारी पाली-सुधागड तहसीलदार उत्तम कुंभार यांना निवेदन देत स्थगित रस्त्याचे काम तात्काळ पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. काम सुरू न झाल्यास मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वीरेश्वर गोडसे यांच्या घरापासून रविंद्र कदम यांच्या घरापर्यंत स्मशानभूमीस जोडणारा रस्ता बांधण्याचे काम सुरू झाले होते. खडीकरणासह मोठा टप्पा पूर्ण झाला होता आणि काम अंतिम अवस्थेत होते. मात्र गावातील नारायण सुतार आणि सुभाष सुतार या दोघांनी कोणतेही कारण नसताना कामात अडथळा निर्माण करत रस्ता बांधकाम बंद पाडल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनात केला आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, हा रस्ता पूर्ण झाल्यास गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार होता. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. “काम अर्धवट थांबवण्यात आल्यानं गावातील वयोवृद्ध, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना देखील मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. हा रस्ता तातडीने पूर्ण झाला पाहिजे,” असे मत ग्रामस्थांच्या वतीने रवींद्र विश्वनाथ जाधव यांनी व्यक्त केले. “काम तात्काळ सुरू झाले नाही, तर आम्ही मोठ्या जनआंदोलनाचा मार्ग अवलंबू,” असा त्यांचा इशारा तहसीलदारांना देण्यात आला. निवेदन देताना मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. त्यात रवींद्र जाधव, किशोर दळवी, कैलास कमेकर, ओंकार गायकवाड, प्रथमेश चव्हाण, विलास गोविंद दळवी, नितीन सुरेश सुतार, वीरेश्वर मुंडे, महेंद्र काजोरे, युवराज सुतार, सागर जाधव, संतोष तुपे, मधुकर दळवी, अनंत खोले, बाबू सुतार, मोरेश्वर सुतार, योगेश चव्हाण, भानुदास दळवी, वसंत दळवी, कमलेश कुणकेकर, प्रदीप परवलकर, विशाल सुतार, गणेश शिर्के, सुनील सुतार, आनंद चव्हाण, दिलीप सतेरे, किसन दळवी, महादेव दळवी आदी ग्रामस्थांचा समावेश होता. ग्रामस्थांची एकमुखी मागणी अशी की, रस्ता पूर्ण होणे हे गावाच्या मूलभूत सोयीसाठी अत्यंत आवश्यक असून प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करून अडथळे दूर करावेत.

CD

गावातील स्थगित रस्त्याचे काम तत्काळ सुरू करा
पाली-सुधागड तहसीलदारांना ग्रामस्‍थांचे निवेदन
पाली, ता. ९ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यातील नवघर गावात सुरू असलेले स्मशानभूमी जोडरस्त्याचे काम अचानक थांबवण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याविरोधात नवघर ग्रामस्थांनी मंगळवारी पाली-सुधागड तहसीलदार उत्तम कुंभार यांना निवेदन देत स्थगित रस्त्याचे काम तत्काळ पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. काम सुरू न झाल्यास मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वीरेश्वर गोडसे यांच्या घरापासून रवींद्र कदम यांच्या घरापर्यंत स्मशानभूमीस जोडणारा रस्ता बांधण्याचे काम सुरू झाले होते. खडीकरणासह मोठा टप्पा पूर्ण झाला होता. हे काम अंतिम अवस्थेत होते; मात्र गावातील काही जणांनी कोणतेही कारण नसताना कामात अडथळा निर्माण करत रस्ता बांधकाम बंद पाडल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनात केला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हा रस्ता पूर्ण झाल्यास गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार होता. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काम अर्धवट थांबवण्यात आल्याने गावातील वयोवृद्ध, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना देखील मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. हा रस्ता तातडीने पूर्ण झाला पाहिजे, असे मत ग्रामस्थांच्या वतीने रवींद्र विश्वनाथ जाधव यांनी व्यक्त केले. काम तत्काळ सुरू झाले नाही, तर आम्ही मोठ्या जनआंदोलनाचा मार्ग अवलंबू,” असा इशारा तहसीलदारांना देण्यात आला.
निवेदन देताना मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. त्यात रवींद्र जाधव, किशोर दळवी, कैलास कमेकर, ओंकार गायकवाड, प्रथमेश चव्हाण, विलास गोविंद दळवी, नितीन सुरेश सुतार, वीरेश्वर मुंडे, महेंद्र काजोरे, युवराज सुतार, महादेव दळवी आदी ग्रामस्थांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Microsoft India Investment : 'मायक्रोसॉफ्ट' भारतात दीड लाख कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक करणार; सत्या नडेलांची मोठी घोषणा!

Dhananjay Munde: वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी 35 वकिलांची फौज; पैसा कोण पुरवतंय? कोर्टाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न

Latest Marathi News Live Update : देवेंद्र फडणवीस हे सावजीसारखे तिखट आणि संत्र्यासारखे गोड- एकनाथ शिंदे

Mumbai News: रिक्षाचालक मुंबईच्या गतीचे हृदय! मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन

Central Railway: नाताळ-नववर्षासाठी मध्य रेल्वेच्या ७६ विशेष गाड्या; पण कोणत्या मार्गावर? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT