मुंबई

प्राध्यापक भरतीचा घोळ

CD

प्राध्यापक भरतीचा घोळ
---
‘त्या’ जाहिराती अन् छाननी अर्जांचे काय होणार?
उच्च व तंत्रशिक्षण विभागाची दोन्ही बाजूने कोंडी
संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः मागील वर्षी राज्यातील अकृषी आणि अभिमतच्या अशा एकूण १५ विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरातीनुसार आलेल्या अर्जाची छाननी करण्यात आली. काही ठिकाणी अंतिम याद्याही तयार झाल्या होत्या; मात्र उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ६ ऑक्टोबर रोजी भरतीचे नवे आदेश जारी केल्याने जाहिराती आणि त्यानंतर झालेल्या प्रक्रियेचे पुढे काय होणार, असा सवाल राज्यातील विद्यापीठांपुढे पडला आहे.
राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये रिक्त असलेल्या प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या जागांसाठी ऑगस्ट–डिसेंबर २०२४दरम्यान जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. राज्यातील हजारो पात्र उमेदवारांनी त्यानुसार अर्ज दाखल केले होते. अनेक विद्यापीठांनी छाननी प्रक्रिया पूर्ण करून मुलाखतीच्या अंतिम टप्प्यात प्रवेश केला होता. बहुतांश ठिकाणी पदेभरती आणि नियुक्त्याही दिल्या होत्या. नव्या आदेशामुळे त्या रोखल्यास अनेक पेच निर्माण होतील. यामुळे गतवर्षीच्या जाहिरातीतील मूळ पात्रता निकषानुसारच भरती प्रक्रिया पूर्ण करणे विभागाला सोयीचे ठरणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
--
पात्रतेत बदल झाल्याने पेच
गतवर्षी विद्यापीठांनी दिलेल्या जाहिरातीवेळी उल्लेखित निकषांनुसार असंख्य उमेदवार पात्र ठरले जाणार होते. आता मात्र त्यांचे काय करायचे, असा सवाल विभागासह उमेदवारांनाही सतावत आहे. ही प्रकिया रद्द केल्यास एखादा उमेदवार न्यायालयात दाद मागू शकतो, अशी भीती विभागाला वाटते. दरम्यान, यामध्ये अनेक महिने उलटल्याने काही उमेदवारांच्या पात्रतांमध्ये बदल झाले आहेत. काहींचे संशोधन लेख, पुस्तके तसेच पी.एचडी आदी पूर्ण झाल्या असल्याने त्यांच्या पात्रतेत बदल झाले आहेत, त्यांचे काय करायचे असाही दुहेरी पेच विभागापुढे पडला असल्याचे विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
----
अशा झाल्या प्रक्रिया..
मुंबई विद्यापीठातील १५२ पदांसाठी ७ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज मागवण्यात आले होते. एसएनडीटी विद्यापीठात बिंदू नामावली आणि आरक्षणाच्या त्रुटींमुळे दोन वेळा अर्ज मागवले. त्यानंतर सुधारित मान्यतेचा प्रस्ताव सादर केला होता. कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठात १२ पैकी ३ पदे भरली होती. ९ पदांची बिंदू नामावली निश्चित करून मान्यतेचा प्रस्ताव दाखल केला होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात लक्ष्मीनारायण तंत्रशिक्षण संस्थेची पदे वेगळी करण्यात आल्याने त्याची उर्वरित प्रक्रिया करण्यात आली होती.
-- --
मुलाखती आणि पदेही भरली..
गोंडवाना विद्यापीठाने तर निवड प्रक्रिया पूर्ण करून वेतन निश्चितीचा प्रस्ताव विभागाकडे दाखल केला होता. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात २८ जुलै ते ४ ऑगस्ट २०२४ या कालावधीत उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण केल्या होत्या. निवड झालेल्या उमेदवारांची यादीही निश्चित करण्यात आली होती. तर पुण्यातील गोखले अभिमत विद्यापीठाने ८ पैकी ६ पदे भरली उर्वरित २ पदांची प्रक्रिया सुरू होती. टिळक अभिमत विद्यापीठात ५ पैकी ४ पदे भरण्यात आली आणि उर्वरित १ पद भरण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Video: 352 वर्षांपूर्वी रायगड कसा होता? पहिल्यांदा जगासमोर 3D मॅपिंग! शिवरायांचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की पाहा

कलमुरुडेश्वर मठाजवळ काँग्रेस ग्रामपंचायत सदस्याची निर्घृण हत्या; आरोपी बजरंग दलाशी संबंधित, दोन गटांत नेमकं काय घडलं?

CM Yogi Adityanath: यूपी होमगार्ड स्थापना दिवस: सीएम योगींकडून जवानांचे कौतुक; भत्त्यांत वाढ आणि आरोग्य योजनेचे आश्वासन

'I Love Your All' जया बच्चन यांच्या वादग्रस्त कमेंटवर अमीषा पटेलचा टोला, म्हणाली...

चेडगावमध्ये बिबट्याचा धुमाकूळ ! 'पंधरा दिवसांत चार जणांवर हल्ला'; रात्री साडेनऊ वाजता भर रस्त्यावर ठाण मांडून अन्..

SCROLL FOR NEXT