मुंबई

साडेतीन कोटींच्या सोने लुटीचा तपास अद्याप गूढ!

CD

नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. १५ : उल्हासनगरात तब्बल साडेतीन कोटींच्या सोन्याच्या धक्कादायक लुटीला दोन वर्षांचा कालावधी होत आला, तरी तपास अद्याप अंधारातच आहे. शहरातील कॅम्प क्रमांक १ येथील ‘विजयालक्ष्मी ज्वेलर्स’ दुकानातील ही घटना सुरक्षारक्षकाच्याच मदतीने घडली होती. पोलिसांनी तातडीने कारवाई करत ३० लाखांचे सोने जप्त करत तीन आरोपींना अटक केली; परंतु सव्वा तीन कोटींपेक्षा अधिकचे सोने आणि मुख्य सूत्रधार अद्यापही बेपत्ता आहेत. विशेष म्हणजे, या तपासासाठी पोलिसांचे पथक थेट भारत-नेपाळ सीमेपर्यंत गेले होते. तरीही लुटीमागील उर्वरित साखळी हाती लागलेली नाही. परिणामी, तपास यंत्रणांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
२८ जून २०२३ मध्ये उल्हासनगर कॅम्प १ येथील प्रसिद्ध ‘विजयालक्ष्मी ज्वेलर्स’मध्ये काम करणाऱ्या सुरक्षारक्षक महेश नेपाळीने आपल्या साथीदारांसह रात्रीच्या सुमारास दुकानातील तिजोरी गॅस कटरच्या साह्याने फोडली. या घटनेत तब्बल सहा किलो सोने अंदाजे साडेतीन कोटी रुपये किमतीचे लंपास करण्यात आले होते. घटनेनंतर महत्त्व लक्षात घेऊन उल्हासनगर पोलिसांसह गुन्हे शाखेच्या आठ विशेष पथकांनी तपासाला गती दिली. एका आठवड्यात तिघांना अटकही करण्यात आली आणि ३० लाखांचे सोने हस्तगत करण्यात आले. मात्र, यानंतर मुख्य सूत्रधार आणि उर्वरित सव्वा तीन कोटींच्या सोन्याचा मागमूसही सापडलेला नाही.
दोन वर्षांपूर्वी घडलेला हा कोट्यवधींचा गुन्हा अजूनही अर्धवट तपासात अडकलेला आहे. तपास यंत्रणांनी सुरुवातीला झपाट्याने कारवाई केली; पण नेपाळ सीमेवर पोहोचूनही आरोपींना गाठण्यात अपयश आल्याने संपूर्ण तपास रेंगाळलेला आहे.

तपासात अडथळे
सोने लूट प्रकरणातील काही आरोपींनी नेपाळमार्गे पलायन केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र, नेपाळमध्ये तपासासाठी जाण्यासाठी भारत आणि नेपाळ सरकारच्या परराष्ट्र खात्यांची औपचारिक परवानगी, न्यायालयीन प्रक्रिया आणि वेळखाऊ सरकारी नियमांची पूर्तता करणे अत्यावश्यक असते. याशिवाय, विनापरवानगी गेलेल्या अधिकाऱ्यांना नेपाळमध्ये अटक करून कारागृहात डांबले जाण्याची धास्ती पोलिसांनी व्यक्त केली. त्यामुळे पुढील तपासात अडथळे निर्माण झाले आणि आरोपी शोधण्यात अपयश आले.


न्याय मिळेल का?
‘विजयालक्ष्मी ज्वेलर्स’चे मालक दिलीप बदलानी यांनी सांगितले की, फक्त ३० लाखांचे सोने परत मिळाले आहे. उर्वरित सोने अद्यापही मिळालेले नाही आणि अन्य आरोपीही सापडलेले नाहीत. आम्हाला न्याय मिळेल का, हा प्रश्न उरतोच आहे.

पोलिसांचे अनपेक्षित उत्तर
उल्हासनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि गुन्हे निरीक्षकांना या प्रकरणाबाबत विचारणा केल्यावर, ही घटना दोन वर्षांपूर्वीची आहे. तपशील माहिती घेऊन सांगावे लागेल, असे सांगून प्रतिक्रिया देण्याचे टाळले. तर उल्हासनगर परिमंडळ ४चे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी ‘प्रकरणाचा आढावा घेत माहिती घेतो’, अशी प्रतिक्रिया दिली.

पोलिस यंत्रणांवर गंभीर प्रश्न
* दोन वर्षे उलटूनही सव्वा तीन कोटींच्या सोन्याचा शोध लागत नसल्याने तपास यंत्रणांची कार्यक्षमता संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.
* आंतरराष्ट्रीय सहकार्य, धोरणात्मक अडथळे आणि वेळखाऊ प्रक्रियेमुळे गुन्हेगार मोकाट फिरत आहेत.
* गुन्हेगारांना पकडण्यात आलेल्या अपयशामुळे उद्योजकांमध्ये असुरक्षिततेची भावना बळावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Rummy Video : रमी नव्हे तर 'हा'गेम खेळत होतो… माणिकराव कोकाटेंनी काय दिलं स्पष्टीकरण?

Manikrao Kokate Rummy: कृषीमंत्री कोकाटेंच्या 'रमी' व्हिडिओनंतर ऑनलाईन गेमिंगवर बंदी येणार का? फडणवीस काय म्हणाले होते?

Ahilyanagar: डॉ. आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे उपमुख्यमंत्री पवारांच्या हस्ते अनावरण: संग्राम जगताप; २७ जुलैला हाेणार अनावरण

WCL 2025 Video: क्रिकेटमध्ये पुन्हा बॉल-आऊट! द. आफ्रिकेने विंडीजवर मिळवला थरराक विजय

Mumbai News: अनधिकृत बांधकामाला अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन! न्यायालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; कारवाईची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT