मुंबई

पालिकेचे कर्मचारी आपत्तीकाळात रजेवर

CD

भिवंडी, ता. २९ (वार्ताहर)ः आपत्कालीन परिस्थितीत राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करत कर्मचाऱ्यांना तत्काळ कामावर हजर करण्याचे निर्देश दिले आहेत, मात्र असे असताना भिवंडी पालिकेचे कर्मचारी मात्र रजेवर असल्याने आमदार रईस शेख यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.
आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार शेख यांनी बुधवारी पालिका मुख्यालयात आढावा बैठक घेतली. या वेळी आमदारांसमोर कर्मचारी रजेवर असल्याचा मुद्दा समोर आला. या वेळी आमदारांनी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारत कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या तत्काळ रद्द करण्याच्या सूचना दिल्या. तसेच राज्याच्या मुख्य सचिवांना तक्रार निवेदन देणार असल्याचेही शेख यांनी सांगितले. या वेळी शहरातील नालेसफाईच्या कामांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. शहरातील नालेसफाईची कामे व्यवस्थित झाली नसल्याने आमदार शेख यांनी नालेसफाईच्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली, तर बकरी ईद सणानिमित्त शहरात आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
-------------------------------------------
वाहतूक कोंडीचा आढावा
शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लवकरच वाहतूक पोलिस प्रशासन, पालिका प्रशासनासोबत संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. तसेच शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती आमदार शेख यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrababu Naidu wife New: चंद्राबाबू नायडूंच्या पत्नीने ‘या’ FMCG शेअरमधून एकाच दिवसांत कमवला ७८,८०,११,६४६ रुपयांचा नफा!

Bank Manager Work Pressure Death: खळबळजनक! बारामतीत 'Workload'मुळे बँक मॅनेजरने बँकेतच गळफास लावून दिला जीव

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरे दोन तास एकाच हॉटेलमध्ये; भेट झाली नसल्याची सूत्रांची माहिती

BMC Election: निवडणुकीनंतर 14 गावे बाहेर काढणार; गौप्यस्फोट करत वनमंत्र्यांनी यादीच दिली

Karad News : विधीमंडळातील मारामारीप्रकरणी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांचा थेट सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले...

SCROLL FOR NEXT