मुरबाड, ता. २० (बातमीदार) : शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्यांना मोबदला न देताच मुरबाड-कल्याण-माळशेज घाट रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांची बाजू कोणी ऐकून घेत नाही. त्यांना मोबदलाही दिला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी न्यायालयात जावे, असा सल्ला माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुरबाड येथे शेतकऱ्यांना दिला.
भाजप व कपिल पाटील फाउंडेशनतर्फे मुरबाड येथे शुक्रवारी कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा झाला. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. मुरबाड-कल्याण रस्त्यावर पाचवा मैल ते मुरबाड आणि माळशेज घाट रस्त्यावर कदम पाडा ते सावरणे यादरम्यान रस्ता रुंदीकरण काम सुरू आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीवर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले; परंतु त्यांना मोबदला दिलेला नाही. हे कृत्य बेकायदा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नवीन खासदारांची निवड होऊन एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात नवीन खासदारांनी एकही काम केले नाही. आतापर्यंत जी कामे चालली आहेत, ती माझ्या कारकिर्दीत मंजूर झालेली आहेत, अशी टीका पाटील यांनी केली. शहापूर-मुरबाड-कर्जत रस्त्याचे काम अपूर्ण असून निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने पाठपुरावा करून रस्त्याचे काम पूर्ण केले पाहिजे, असे यावेळी पाटील म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.