बिहारमधील ‘जंगलराज’
जनता विसरणार नाही!
नवी दिल्ली, ता. २३ : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी गुरुवारी राष्ट्रीय जनता दल आणि काॅँग्रेसवर जाेरदार टीका केली. बिहारमध्ये पुढील शंभर वर्षांपर्यंत जंगलराजची चर्चा सुरू राहील. विराेधकांनी आपली पापे कितीही लपवण्याचे प्रयत्न केले तरी जनता त्यांना कधीच माफ करणार नाही, असा टाेला पंतप्रधान माेदी यांनी लगावला.
‘मेरा बूथ सबसे मजबूत : युवा संवाद’ या कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय जनता दल आणि काॅँग्रेसच्या आघाडीने तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून आज जाहीर केले. त्यावर माेदी म्हणाले, ‘विराेधकांची आघाडी ही ‘गठबंधन’ नाही तर ‘लठबंधन’ आहे. दिल्ली आणि बिहारमधील त्यांचे सर्व नेते जामिनावर बाहेर आहेत. ‘जंगलराज’मधील अत्याचारांबाबत बुजुर्गांनी युवापिढीला माहिती द्या, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.