मुंबई

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश

CD

वाडा, ता. २५ (बातमीदार) ः देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होत असताना देशाच्या आर्थिक राजधानीपासून अवघ्या काही किमीवर असलेला कातकरी समाज आजही अस्तित्वाच्या लढाईत झुंजत आहे. दारिद्र्य, अन्याय आणि सरकारच्या दुर्लक्षाच्या सावलीत हा समाज उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या समाजाच्या अस्तित्वासाठी ५ ते ७ नोव्हेंबरदरम्यान ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन छेडण्याचा इशारा श्रमजीवी संघटनेने दिला आहे.

वनहक्क, गावठाण हक्क आणि मुक्त वेठबिगारांचे पुनर्वसन अद्यापही प्रलंबित आहे. रोजगार हमी योजनेतील मजुरीचे थकीत पैसे न मिळाल्याने अनेक कुटुंबांचे पोट दिवसेंदिवस उपाशी राहते आहे. शिवाय, पाण्यात रसायन मिसळून तयार होणाऱ्या विषारी दारूमुळे अनेक तरुणांचे आयुष्य आणि घरांची स्वप्ने संपुष्टात आली आहेत. याच दरम्यान, शासकीय आणि वन जमिनींवर प्रार्थना मंदिरे उभारून धर्मांतराचे जाळे विणले आहे. परिणामी, कातकरी समाज आपली पारंपरिक ओळख, संस्कृती आणि विश्वासापासून दुरावत चालला आहे. अठराविश्व दारिद्र्यामुळे कोवळ्या मुलींचा व्यवहार, कर्जबाजारीपणामुळे वाढलेली वेठबिगारी, स्थलांतरामुळे खंडित झालेले शिक्षण आणि वाढते बालमृत्यू या समस्यांनी कातकरी समाजाचे जीवन काळोखात ढकलले गेले आहे.

या गंभीर आणि अन्यायकारक परिस्थितीकडे सरकार, तसेच समाजाचे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ पदाधिकारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलनाचा मार्ग अवलंबणार आहेत. सरकारने तत्काळ ठोस पावले उचलावीत आणि कातकरी समाजाला जगण्याचा अधिकार द्यावा, अशी मागणी केली जाणार आहे. कातकरी समाजाने वर्षानुवर्षे जंगल दिले, श्रम दिले; पण त्याला जगण्याचा हक्क मिळाला नाही. आता त्यांच्यासाठी आम्ही शांत बसणार नाही, असे वक्तव्य संघटनेचे अध्यक्ष वारणा यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्ना ठरला बिग बॉस 19 चा विजेता, फरहाना भट्ट ठरली रनरअप

Mumbai: बीएमसीच्या प्रारूप मतदार यादीत मोठे बदल; चार वॉर्डमध्ये ५०% पेक्षा जास्त वाढ, तर २४ वॉर्डमध्ये घट

Khandala : सातारा-पुणे मार्गावर भरधाव ट्रकची अनेक वाहनांना धडक, ट्रकचालक फरार

रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक फिस्कटले! हुतात्मा, वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरला वेळेत, पण दक्षिणेकडे जाणाऱ्या ‘या’ गाड्या २ ते ३ तासांनी धावताहेत उशिराने

Nanded Drug Seizure : शिवणीत तुरीच्या ताशेत लपवलेला ‘गांजा’ उघड; पोलिसांची धाड, ₹1.60 लाखांचा मुद्देमाल जप्त!

SCROLL FOR NEXT