भिवंडी, ता. २८ (वार्ताहर) : कापणीच्या वेळीच आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. सकाळी कापलेले भाताचे लोंब शेतात ठेवले असतानाच रात्री झालेल्या पावसात ते पुन्हा ओले होऊन नासाडी झाली आहे. काही ठिकाणी भाताचे कोंब फुटले आहेत, तर काही पीक पूर्णतः कुजले आहे. ग्रामीण भागातील या संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार शांताराम मोरे आणि शिवसेना नेते प्रकाश पाटील यांनी प्रत्यक्ष शेतांवर जाऊन नुकसानीचे निरीक्षण केले.
सात-आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. ओल्या भाताचे तण गुरे खात नाहीत, तर धान्य माणसालाही वापरण्यायोग्य राहिलेले नाही, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत आमदार मोरे म्हणाले, दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते; मात्र ती मिळाली नाही. आता नव्याने अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना सावरण्यासाठी मी आजच मंत्रालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन भरीव मदतीची मागणी करणार आहे.
तहसीलदारांशी झालेल्या चर्चेत त्यांनी सांगितले, अगोदरच्या पंचनाम्याचे अहवाल सरकारकडे पाठवले आहेत, तर काही शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया बाकी असल्याने दोन दिवसांत त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, अशी माहिती शिवसेना नेते प्रकाश पाटील यांनी दिली.
काळी दिवाळी साजरी
सरकारने दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देण्याचे सांगितले; पण ती मिळालीच नाही. आता पुन्हा अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. आमच्या शेतीचे पंचनामे तत्काळ करून काहीतरी मदत दिली नाही, तर आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया शेतकरी सुरेश लोणे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.