मुंबई

शेतकरी कृती समिती आंदोलनाच्या पवित्र्यात

CD

वज्रेश्वरी, ता. १ (बातमीदार) : पालघर तसेच ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातून जाणाऱ्या खावडा टॉवर लाईन संदर्भात स्थानिक शेतकऱ्यांनी शेतकरी संघर्ष कृती समिती स्थापन केली आहे. या विषयावर अनेक वेळा भिवंडी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊनही शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे कृती समिती आता तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात असून, नुकतीच याबाबत दाभाड येथे सभा पार पडली.
ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या क्षेत्रफळाच्या जमिनी नाहीत. बहुतांश शेतकऱ्यांकडे अर्ध्या एकरपासून तीन ते पाच एकरांपर्यंत कौटुंबिक जमीन आहे. त्यातच गॅस आणि तेलवाहिन्या प्रकल्पासाठी वापरहक्काने घेतलेल्या जमिनींचे योग्य मोबदले मिळाले नाही. शिवाय, कंपन्यांनी त्या जमिनी शेतीयोग्य ठेवल्या नाहीत. उरलेल्या जमिनींवर कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी कष्टाने पिके घेतली जात असतानाच निसर्गानेही शेतीचे मोठे नुकसान केले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि सक्षम दंडाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना भेटून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून तातडीने भरपाई देण्याची मागणी केली होती. त्यांनी आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. भिवंडी प्रांताधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता ३३०० रुपये प्रति स्क्वेअर मीटर असा दर निश्चित केल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी हा दर नाकारला होता. तरीदेखील तोच दर लादण्यात आल्याने शेतकऱ्यांनी याला तीव्र विरोध दर्शविला आहे.

पालकमंत्र्यांचा निषेध
पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा संताप शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक राजन गावंड यांनी गणेश नाईक यांचा निषेध नोंदवला आहे. जर प्रशासनाने आणि सरकारने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा कृती समितीचे समन्वयक भगवान सांबरे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SA W World Cup Final: भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याची वेळ बदलली... नवी मुंबईतून समोर आली महत्त्वाची बातमी, जाणून घ्या टॉस कधी

Ganesh Kale Murder: गणेश काळे हत्या प्रकरणात बंडू–कृष्णावर गुन्हा दाखल, आंदेकर गँगचा डाव उघड! पोलिसांनी दिली माहिती

पार्टीला जातोय! रात्री आईला सांगितलं, पहाटे अपघातात चुलत भावांचा मृत्यू; भरधाव वेगात हँडब्रेक ओढला अन् सगळं संपलं

Viral Story: २० रुपयांच्या नाण्यांत जपलेलं प्रेम… नवऱ्याने एका वर्षात बायकोसाठी जमा केलं 'सोनेरी' सरप्राइज! दुकानदारही भावूक

Latest Marathi News Update : मुसळधार पावसाचा मिरची पिकावर गंभीर परिणाम, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

SCROLL FOR NEXT