तलासरीत हिरवाईवर गदा?
तलासरी : पालघर जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी मुंबई–वडोदरा सुपर हायवे हा राष्ट्रहिताचा प्रकल्प मानला जात असला, तरी त्याच्या कामामुळे पर्यावरणावर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र समोर आले आहे. विशेषतः तलासरी तालुक्यात तब्बल १४,१३६ झाडांची कत्तल करण्यात आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील हिरवाईवर गदा आली असून पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत.
या महामार्गासाठी आदिवासी आणि वन विभागाच्या जमिनींचे भूसंपादन करण्यात आले आहे. संपादित जमिनींवरील उभ्या झाडांची मोठ्या प्रमाणात तोड झाली असून, संबंधित शेतकऱ्यांना झाडांच्या नुकसानीबाबत मोबदला देण्यात आल्याची माहिती मिळते. मात्र शासनाने ‘एक झाड तोडलं तर दहा झाडं लावायची’ असा स्पष्ट नियम घातला असला, तरी या झाडांची प्रत्यक्ष लागवड झाली का, याबाबत ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून शासनाकडे गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
-------------
सुमारे १४ हजार झाडांची कत्तल झाल्याने तलासरीसह पालघर जिल्ह्याच्या पर्यावरणावर मोठा परिणाम होणार आहे. शासनाची धोरणे स्पष्ट असली तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. या झाडांच्या जागी दहापट झाडांची लागवड होणे अत्यावश्यक आहे अन्यथा आगामी काळात तापमान वाढ, शेतीतील आर्द्रता घट आणि प्रदूषणात वाढ अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
- प्रकाश अभ्यंकर, पर्यावरण अभ्यासक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.