मुंबई

राहुल गांधीविरुद्ध मानहानी खटल्याची सुनावणी लांबणीवर

CD

राहुल गांधीविरुद्ध खटल्याची सुनावणी लांबणीवर
साक्षीदार अनुपस्थितीमुळे पुढील सुनावणी २० डिसेंबरला
भिवंडी, ता. ७ (वार्ताहर) ः काँग्रेस पक्षाच्या जाहीर सभेत राहुल गांधी यांनी आरएसएसच्या लोकांनी गांधीजींची हत्या केली, असे कथित विधान केले होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रारंभी भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथे ६ मार्च २०१४ मध्ये त्यांनी हे विधान केले होते. याबद्दल स्थानिक आरएसएस कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल फौजदारी मानहानीच्या खटल्याची सुनावणी २० डिसेंबरपर्यंत तहकूब केली आहे. सरकारी वकिलांच्या प्रमुख साक्षीदाराच्या अनुपस्थितीमुळे न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.
शनिवारी (ता. ६) या खटल्याची सुनावणी भिवंडी न्यायालयात होती, परंतु साक्षीदार अशोक सायकर वैयक्तिक कारणांमुळे हजर राहू न शकल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता २० डिसेंबर रोजी सायकर यांची साक्ष नोंदवली जाण्याची शक्यता गांधी यांचे वकील ॲड. नारायण अय्यर यांनी दिली आहे. सायकर सध्या सोलापूरमधील बार्शी येथे पोलिस उपअधीक्षक आहेत. या खटल्यात सायकर यांची साक्ष महत्त्वाची मानली जात आहे. कारण २०१४ मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून त्यांनी मानहानीच्या खटल्याचा प्रारंभिक तपास केला होता. सायकर यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे, न्यायालयाने राहुल गांधींविरुद्ध समन्स जारी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Officer Inspiring Journey : 'पैशांची कमरता पण स्वप्नांची नाही', गरिबीला हरवत गाठले ‘क्लास वन’अधिकारी; कोल्हापूरच्या राकेशचा थक्क करणारा प्रवास

माधुरीच्या पतींची हेल्दी जर्नी! श्रीराम नेनेंनी 18 किलो वजन कसं घटवलं? सांगितलं फिटनेसचं रहस्य

Hardik Pandya-Mahieka Sharma: हार्दिकची सटकली! माहिकाचा 'त्या' अँगलने Video काढणाऱ्या paparazzi वर संतापला; म्हणाला, ती पायऱ्या उतरत असताना....

Kolhapur MSEDCL : विमा, ईएसआय, पीएफ नाही; अपघात झाला तर जबाबदार कोण? महावितरण कंत्राटी कामगारांचा थरकाप उडवणारा सवाल

Navi Mumbai: ९३५ रुपयांत नवी मुंबई ते मुंबई जलप्रवास; नेरूळ जेट्टीवरील सेवा सुरू होणार, पण कधी? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT