पुणे

‘‍छत्रपती’च्या गळीत हंगामाचा पवार यांच्या हस्ते शुक्रवारी प्रारंभ

CD

वालचंदनगर, ता.२८ :भवानीनगर (ता.इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ च्या गळीत हंगामाचा प्रारंभ व गव्हाण पूजन उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.३१) होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली.
श्री छत्रपती कारखान्याच्या सन २०२५-२६ च्या गळीत हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. कारखान्याच्या ओव्हर ऑईलिंग, दुरुस्तीची कामे वेळेपूर्वीच पूर्ण झाली आहेत. वॉटर, स्टीम ट्रायल यशस्वी झाल्या आहेत. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणी मजूर दाखल झाले असून, ऊस तोडणीस ही लवकर सुरू होईल. शासनाच्या निर्देशाप्रमाणे राज्यातील कारखाने १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. श्री छत्रपती कारखाना ही एक नोव्हेंबर रोजी गाळप सुरू करणार आहेत. चालू वर्षीच्या गळीत हंगामामध्ये सभासदासात उत्साह पाहण्यास मिळत असून, जास्तीजास्त सभासदांच्या उसाचे गाळप करण्याचे नियोजन संचालक मंडळाने केले आहे. श्री छत्रपती कारखान्याला अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. संचालक मंडळाने १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. गव्हाण पूजनप्रसंगी उपमुख्यमंत्री पवार, खासदार सुनेत्रा पवार, कृषिमंत्री भरणे, सारिका भरणे उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ३५ हजार शिक्षकांचा कापला जाणार एक दिवसाचा पगार; आंदोलनावेळी बंद राहिल्या राज्यातील २४ हजार शाळा; आता ९ अन्‌ १२ तारखेला नागपूरमध्ये आंदोलन

Dhule News : उभा केलेला ट्रॅक्टर उतारावरून मागे सरकला अन् विहिरीत कोसळला; ३ वर्षीय दोन मुली बुडाल्या, एकीला वाचवलं

Khandala : सातारा-पुणे मार्गावर भरधाव ट्रकची अनेक वाहनांना धडक, ट्रकचालक फरार

Indigo Crisis : ६१० कोटी दिले रिफंड, ३ हजार बॅग्जही पोहोचवल्या; आज इंडिगोच्या १६५० विमानांचं उड्डाण

Mangalwedha News : खरीप ते रब्बी; प्रत्येक हंगामात दुबार पेरणी; शेतकऱ्यांच्या व्यथेला शासनानं कधी दाद द्यायची!

SCROLL FOR NEXT