वाल्हे, ता.२७ : पुरंदर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. वाल्हे, आडाचीवाडी, जेऊर, मांडकी, सुकलवाडी, वागदरवाडी आदी परिसरांमध्ये पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मागील तीन दिवसांपासून दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसामुळे सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.
सततच्या पावसामुळे शेतातील कांदा, ज्वारी, ऊस, कारले, काकडी, भाजीपाला आणि फुलपिके मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेली आहेत. काही
भागांत पिकांची मुळे कुजण्यास सुरुवात झाली असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांपुढे संकटांचा डोंगर उभा राहिला आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार
पावसामुळे वाल्हे येथील शेतकरी सचिन देशपांडे आणि सुकलवाडी येथील अशोकमहाराज पवार यांच्या शेतातील तोडणीला आलेला ऊस जमीनदोस्त झाला.
वाऱ्याच्या तीव्र झोतामुळे उसाचे पीक भुईसपाट झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
तीन एकर ऊस तोडणीला तयार आहे, पण वादळ व पावसाने सारा ऊस जमीनदोस्त झाला आहे. कारखान्याने तातडीने तोडणी सुरू करून ऊस त्वरित
नेण्याची गरज आहे, अशी मागणी सचिन देशपांडे यांनी केली.
सततच्या पाऊस व वातावरणातील बदलामुळे कांदा, कारली, ज्वारीसह भाजीपाल्याची परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती.
मात्र गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे पिकांच्या मुळाशी पाणी साचले असून, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे उत्तम बुनगे, विनय
पवार, सुनील गोळे आदी शेतकऱ्यांनी खंत व्यक्त केली आहे.
05587
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.