पुणे, ता. १ : राज्य सरकारने नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांचे संरक्षण होण्यासाठी रब्बी हंगामातही ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ लागू केली आहे. खरीप २०२५ आणि रब्बी २०२५-२६ हंगामासाठी गहू, रब्बी ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग आणि रब्बी कांदा या सहा पिकांचा विमा घेता येणार आहे. या योजनेत कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. निश्चित मुदतीत विमा भरल्यास नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळणार आहे, अशी माहिती कृषी विभागाचे मुख्य सांख्यिकी वैभव तांबे यांनी दिली.
शेतकऱ्यांना योजनेच्या पोर्टलवर स्वत: किंवा बँक, विमा कंपनीने नियुक्त केलेले एजंट, क्रॉप इन्शुरन्स ॲप किंवा सामूहिक सेवा केंद्रामार्फत योजनेत नोंदणी करता येणार आहे. योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत रब्बी ज्वारीसाठी (बागायत व जिरायत) ३० नोव्हेंबर, गहू (बागायत), हरभरा, रब्बी कांदा या पिकांसाठी १५ डिसेंबर व उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग या पिकांकरिता ३१ मार्चपर्यंत आहे. त्यासाठी विमा योजनेचे पोर्टल कार्यान्वित केले असल्याचे तांबे यांनी सांगितले.
कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज देणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास तसे त्यांनी नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेस लेखी कळविणे आवश्यक आहे, असेही तांबे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.