Shubham Banubakode
जयपूर हे सवाई जयसिंग II यांनी 1727 मध्ये स्थापन केलेले नियोजित शहर होते. हे शहर आजच्या गुलाबी शहराच्या तुलनेत साधे, परंतु भव्य होते.
1876 मध्ये वेल्सच्या राजकुमाराच्या स्वागतासाठी जयपूरला प्रथम गुलाबी रंगात रंगवण्यात आले, ज्यामुळे त्याला "पिंक सिटी" ही ओळख मिळाली.
जयपूरच्या हवा महाल, सिटी पॅलेस आणि अंबर किल्ल्याचे 1870-1890 च्या काळातील फोटो दर्शवतात की, त्यावेळी या वास्तू दगडी बांधकाम आणि कोरीव कामाने सजलेल्या होत्या.
पाच मजली हवा महाल, त्यावेळी राजा-राणींसाठी विश्रांतीस्थळ म्हणून वापरला जात होता. त्याची रचना सूर्यकिरणांमध्ये अधिक खुलून दिसायची.
अरावली पर्वतराजीतील अंबर किल्ल्याचे 150 वर्षांपूर्वीचे फोटो त्याच्या भव्यतेची साक्ष देतात. सोलाव्या शतकात राजपूत राजा मानसिंग यांनी त्याची निर्मिती केली होती.
1890 मधील जयपूरच्या मुख्य रस्त्यांचे फोटो दाखवतात की, रस्ते नियोजित, रुंद आणि दुतर्फा दुकानांनी सजलेले होते.
जयपूरचा प्रहरी असलेला नाहरगढ किल्ला त्यावेळी शहराच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा होता. त्याचे फोटो शहराच्या पश्चिमेला भव्य दृश्य दाखवतात.
जयपूरच्या आसपासच्या डोंगर आणि परिसरात तेव्हा फारसा विकास नव्हता. गलता तीर्थ आणि अरावलीच्या पायथ्याशी नैसर्गिक सौंदर्य दिसायचे.
ब्रिटिश आणि स्थानिक छायाचित्रकारांनी घेतलेले 1870-1890 च्या फोटो जयपूरच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला उजागर करतात.