सकाळ वृत्तसेवा
आग्र्याला दरबारभेटीसाठी आलेल्या शिवरायांना औरंगजेबाने दगाफटका करून नजरकैदेत बंद केले.
शिवाजी महाराजांनी आजारी असल्याचे भासवत नजरकैदेत मोठ्या संख्येने फळांची टोपली मागवली.
संभाजीराजांसाठी आणि स्वतःसाठी दोन मोठ्या टोपल्या तयार करण्यात आल्या. गुप्तपणे त्या टोपल्यांमध्ये लपून दोघेही कैदेतून सुटले.
टोपल्यातून सुटल्यानंतर मुघलांना चकवा देत शिवरायांनी छुप्या वाटांनी मथुरेकडे प्रयाण केले.
असं म्हणतात की सांजवेळी शिवाजी महाराज व त्यांच्या सोबत्यांनी यमुना पार केली. एका झाडीत विश्रांती घेत अंधारात अंबिका वन गाठले.
शिवाजी महाराजांनी पावसात भिजत देवीची पूजा करून सुवर्ण छत्र अर्पण केलं असल्याच्या कथा सांगितल्या जातात.
प्रभातकाळी पितापुत्राचे मुंडन करून वेषांतर करण्यात आलं. शिवाजी महाराज साधूंच्या वेषात पुढे निघाले.
मथुरेत शिवाजीराजांचे तीर्थगुरू मकरंद भट व गोवर्धन राहत होते. शिवाय पेशवा मोरोपंत पिंगळे यांचे मेहुणे कृष्णाजी त्रिमल मथुरेत होते.
मथुरेत कृष्णाजी त्रिमल यांच्या हाथीवाली गली येथील एका हवेलीमध्ये संभाजी महाराज अनेक महीने राहिले.
मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला शिवराय राजगडावर पोहोचले. त्यानंतर २-४ महिन्यांनी संभाजी महाराज स्वराज्यात परतले.
अभिनय सोडून कारगिल युद्धात सहभागी झालेला फक्त 'हा' मराठी कलाकार