अकबर-बीरबल मैत्री कशी झाली? महेश दास बीरबल कसा बनला?

सकाळ डिजिटल टीम

अकबर-बीरबल

अकबर बीरबल यांचे किस्से जवळपास पाच शतकानंतरही सांगितले जातात. त्यांच्यातल्या मैत्रीचंही उदाहरण दिलं जातं.

Akbar Birbal

|

Esakal

बीरबल कोण होते?

बीरबल यांचे खरे नाव महेश दास होते. ते सामान्य कुटुंबातून आले, पण त्यांच्या बुद्धिमत्ता, काव्यकौशल्य आणि हजरजबाबीपणामुळे अकबर यांच्या दरबारात पोहोचले.

Akbar Birbal

|

Esakal

अकबरांची पहिली भेट

महेश दास यांच्या बुद्धीने प्रभावित होऊन अकबर यांनी त्यांना 'बीरबल' ही पदवी दिली. पुढे ते मुगल दरबारातील नवरत्नांपैकी एक बनले.

Akbar Birbal

|

Esakal

मैत्री की फक्त दरबारी नातं?

अकबर आणि बीरबल यांचं नातं केवळ राजा-दारबारी इतकंच नव्हतं. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये अकबर अनेकदा बीरबलांचा सल्ला घेत असत आणि त्यांच्यावर विशेष विश्वास ठेवत.

Akbar Birbal

|

Esakal

दरबारात इर्षा

बीरबलांना मिळणारा मान, अकबरांची जवळीक आणि त्यांची हजरजबाबी शैली यामुळे अनेक दरबारी त्यांच्यावर जळत असत. तरीही अकबरांचा त्यांच्यावरचा विश्वास कधी कमी झाला नाही.

Akbar Birbal

|

Esakal

बीरबलांचा मृत्यू

1586 मध्ये उत्तर-पश्चिम मोहिमेदरम्यान झालेल्या हल्ल्यात बीरबल वीरमरण पावले. हा अकबरांसाठी वैयक्तिक आणि राजकीयदृष्ट्या मोठा धक्का होता.

Akbar Birbal

|

Esakal

अकबरांनी अन्न का सोडलं?

इतिहासातील नोंदीनुसार, बीरबलांच्या मृत्यूची बातमी समजताच अकबरांनी दोन दिवस अन्न ग्रहण केलं नाही. त्यांच्या विश्वासू मित्राच्या निधनाने ते अत्यंत दुःखी झाले होते.

Akbar Birbal

|

Esakal

मैत्रीचा खरा अर्थ

अकबर-बीरबलांची मैत्री सांगते की विश्वास, प्रामाणिकपणा, बुद्धिमत्ता आणि परस्पर सन्मान हीच खरी मैत्रीची पायाभरणी असते. म्हणूनच फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने ही जोडी आजही प्रेरणादायी मानली जाते.

Akbar Birbal

|

Esakal

फकीरा वाचली, मग अण्णा भाऊ साठे यांची ही ८ पुस्तके नक्की वाचा

इथं क्लिक करा