Anushka Tapshalkar
डॉ. आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार होते. त्यांनी एकहाती घटनेचा मसुदा लिहून काढला. कशी होती त्यांची घटना लिहितानाची दिनचर्या
बाबासाहेब सकाळी 6 वाजता उठत. 7.30 पर्यंत प्रातर्विधी, स्नान, न्याहारी करून संविधान लेखनासाठी सज्ज होत.
घटनाभवनात पोहोचल्यावर सर्वप्रथम सेक्रेटरीसोबत 15-20 मिनिटांची महत्त्वाची चर्चा होत असे.
सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत संविधान समितीच्या कामात ते संपूर्णपणे गुंतलेले असत.
संविधानाच्या कामानंतर दुपारी १२ ते १.३० ते कायदेमंत्री म्हणून त्यांच्या कार्यालयीन जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करत.
जेवणानंतर दुपारी २ वाजता थोडी विश्रांती घेतली जात असे. परंतु वाचन त्यातही सुरूच राहायचं!
घटनासमितीतील पक्षीय चर्चेसाठी संध्याकाळी ४ नंतर वेळ दिला जात असे.
घटनेचे बारकावे समजावून देण्यासाठी बाबासाहेब इतर सदस्यांना मार्गदर्शन करायचे.
संपूर्ण दिवसभर काम करून ते संध्याकाळी घरी परतत व त्यानंतर रात्री ७-८ ला विश्रांती करायला जात. भारताच्या भवितव्याचा विचार करत काम करत राहायचे.