Sandip Kapde
मुंबईत जन्मलेले अर्देशीर तारापोर हे पारशी घराण्यातले होते. त्यांचे पूर्वज रतनजीबा शिवाजी महाराजांच्या सैन्यात अधिकारी होते.
हैदराबादमध्ये वाढलेल्या तारापोर यांना लहानपणापासून रणगाड्यांचे आकर्षण होते. त्यांनी हैदराबाद इन्फन्ट्रीत प्रवेश घेतला आणि नंतर आर्मर्ड डिव्हिजनमध्ये आले.
दुसऱ्या महायुद्धात मध्यपूर्वेत त्यांनी लढत मोठा पराक्रम गाजवला. स्वातंत्र्यानंतर भारतीय लष्करात ‘पूना हॉर्स’मध्ये दाखल झाले.
पाकिस्तानविरुद्ध सियालकोट भागात फिल्लोरा काबीज करण्याची जबाबदारी पूना हॉर्सच्या तारापोर यांच्यावर होती.
पाकिस्तानने १३५ रणगाडे पाठवले. चविंडाजवळ भारतीय सेना अडकली, तरीही तारापोर यांनी ठामपणे लढायचा निर्णय घेतला.
भयंकर हल्ला होत असतानाही त्यांनी जागा सोडली नाही. स्वतः जखमी होऊनही आपल्या सैनिकांना प्रेरणा दिली.
भारतीय जवानांनी ६० रणगाडे जाळून टाकले. चविंडा हे युद्ध रणगाड्यांचं स्मशान ठरलं.
या युद्धात तारापोर वीरमरण पावले. पण त्यांनी लढलेलं युद्ध भारताच्या विजयासाठी निर्णायक ठरलं.
लेफ्टनंट कर्नल अर्देशीर तारापोर यांना मरणोत्तर परमवीर चक्र देऊन गौरवण्यात आलं. त्यांचं शौर्य इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं.