बाबासाहेब आंबेडकरांना विमानात ही वस्तू नेण्यास करण्यात आली होती मनाई

सकाळ ऑनलाईन

📘प्रस्तावना

१९५६ मध्ये नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक धम्मदीक्षा घेतली. त्या काळातील अनेक अनमोल आठवणी आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत.

📘श्याम हॉटेलमध्ये मुक्काम

धम्मदीक्षेपूर्वी बाबासाहेब नागपूरच्या श्याम हॉटेलमध्ये थांबले होते. हे हॉटेल आजही त्या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार आहे.

📘आनंदनगरमधील स्वागत

हॉटेलसमोरच्या आनंदनगर वस्तीतील राधा कांबळे व अन्य महिलांनी बाबासाहेबांना प्रेमाने 'लंब्या रोट्या' खाऊ घातल्या होत्या.

📘'१८५७' नंबरची गाडी

बाबासाहेब नागपूरात ‘१८५७’ क्रमांकाच्या गाडीतून आले होते, अशी आठवण चरणदास चिकाटे यांनी दिली आहे.

📘ऐतिहासिक धम्मदीक्षा

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी लाखोंच्या उपस्थितीत बौद्ध धम्म स्वीकारला. ही घटना भारतीय इतिहासातील क्रांतिकारी वळण होती.

📘परतीचा प्रवास

धम्मदीक्षेनंतर १८ ऑक्टोबर रोजी बाबासाहेब आंबेडकर नागपूरच्या सोनेगाव विमानतळावरून मुंबईकडे रवाना झाले.

📘बाबासाहेबांची काठी

विमानप्रवास नियमांनुसार, बाबासाहेबांची काठी विमानात नेता येत नव्हती. ती काठी एअरड्रोम ऑफिसमध्ये जमा केली जाणार होती.

📘प्रल्हाद मेंढे यांचा निर्णय

प्रल्हाद मेंढे यांनी ही काठी बाबासाहेबांची आठवण म्हणून आपल्याकडे कायमची जपली. आजही ही काठी स्मृतिस्वरूप जपली जाते.

📘पाहाण्यासाठी ठेवली जाते काठी

प्रत्येक वर्षी १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला ही काठी जनतेला पाहाता यावी म्हणून उपलब्ध करुन दिली जाते.