संतोष कानडे
राज्यातल्या काही भागांमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लू आजाराजी लागण झाल्याचं निदर्शनास येत आहे
मराठवाड्यातल्या लातूरमध्ये तर चार हजार कोंबड्या मृत्यूमुखी पडलेल्या आहेत.
ठाण्याच्या काही भगाांमध्येही कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे
तसेच रायगडच्या उरणमध्येही कोंबड्या दगावल्या. नागपूमध्ये मोराचा मृत्यू झाल्याची माहिती आहे
चिरनेरमध्ये तब्बल दीड हजार कोंबड्या नष्ट करुन परिसराचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं
बर्ड फ्लू बाधित चिकन खाल्ल्यामुळे नागपूरमध्ये तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे
त्यामुळे सद्य घडीला चिकन आणि उकडलेली अंडी खावीत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ज्या भागातील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झालेली नाही, अशा भागामध्ये चिकन आणि अंडी खाण्यास हरकत नाही
ठाण्यामध्ये १२७ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे. तर ७५ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले
त्यामुळे खबरदारी म्हणून कोपरी परिसरातील चिकन आणि अंडी विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत
ठाण्यातील कोपरी परिसर वगळता कोणत्याही भागात बर्ड फ्लू नाही, त्यामुळे अंडी व चिकन शिजवून खाण्याबाबतचं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जोशी यांनी केलं आहे.