जय हिंद घोषणा कोणी बनवली? हिटलरला मागावी लागली होती माफी

Aarti Badade

चेम्पकरमण पिल्लई – एक परिचय

१८९१ मध्ये त्रिवेंद्रम येथे जन्मलेले चेम्पकरमण पिल्लई टिळकांमुळे प्रेरित होऊन स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय झाले. शिक्षणासाठी ते युरोपला गेले.

Champakaraman Pillai | Sakal

पहिले निर्वासित भारतीय सरकार

१९१५ मध्ये अफगाणिस्तानमध्ये भारताचे पहिले हंगामी सरकार स्थापन झाले. यात पिल्लई परराष्ट्रमंत्री बनले.

Champakaraman Pillai | Sakal

हिटलरच्या विरोधात गर्जना

जेव्हा हिटलरने भारतीयांबद्दल वंशद्वेषी वक्तव्य केले, तेव्हा पिल्लई यांनी त्याला सडेतोड पत्र लिहिले. हिटलरला माफी मागावी लागली.

hitler | Sakal

'जय हिंद'चा जन्मदाता

चेम्पकरमण पिल्लई यांनीच 'जय हिंद' या राष्ट्रघोषणेची निर्मिती केली! हाच नारा पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वीकारला.

Champakaraman Pillai | Sakal

नेताजींचा विजयी नारा

नेताजींनी 'जय हिंद'ला आझाद हिंद सेनेचा अधिकृत नारा बनवले. स्वातंत्र्यानंतरही भारतीय लष्कर अभिमानाने ही घोषणा देतात.

Netaji Subhash Chandra Bose | Sakal

एका क्रांतिकारकाची अद्भुत क्षमता

भारतापासून दूर असतानाही चेम्पकरमण पिल्लई यांनी ब्रिटिशांविरुद्ध युरोपमध्ये जोरदार संघर्ष केला.

Champakaraman Pillai | Sakal

एका बलिदानाची शोकांतिका

हिटलरच्या रोषामुळे जर्मनीतील त्यांचे घर सरकारने जप्त केले. त्यानंतर ते इटलीला गेले, पण तिथे विषबाधेने त्यांचा मृत्यू झाला.

hitler | Sakal

अखेरचे भावनिक वचन

मृत्यूपूर्वी त्यांनी पत्नी लक्ष्मीला वचन दिले – "माझी अस्थी केरळमध्ये विसर्जित करा." स्वातंत्र्यानंतर हे वचन पूर्ण झाले.

Champakaraman Pillai | Sakal

मुघलांचा मूळ देश कोणता? ते भारतात का राहिले?

Mughal Empire True Origins | Sakal
येथे क्लिक करा