Shubham Banubakode
आज आपण कर भरतो आणि कररुपी भरलेला पैसा सरकार जनतेच्या सेवासाठी खर्ज करते.
हीच पद्धत कधीकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही लागू होती.
मात्र, शिवरायांच्या काळात कर कसा ठरवला जात होता? तुम्हाला माहिती आहे का?
शिवरायांच्या काळात कराला शेतसारा म्हटलं जायचं. हा शेतसारा गोळा करण्यासाठी शिवरायांनी नियम आणि अटी घालून दिल्या होत्या.
शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला व गवताच्या काडीलाही हात लावू नका, अशा आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला होता.
इतकंच नाही तर सैन्यातील घोड्यांना दाणापाणी वैरण लागली तर रोख रक्कम देऊन खरेदी करा, असा आदेशही त्यांनी दिला होता.
रयतेकडून किती व कसा शेतसारा जमा करायचा याचे पूर्ण अधिकार कुलकर्णी, पाटील, देशमुख, वतनदार, जहागीरदार यांना होते.
परंपरेनुसार संरक्षण म्हणून खर्च वजाजाता राहिलेल्या उत्पत्राचा षष्ठांश भाग राजाला कर म्हणून दिला जात होता.
परंतु शिवरायांनी कर ठरविताना खर्च वजा न करता एकूण उत्पन्नाच्या दोनपंचांश कर निश्चित केला.
दोनपंचांश महणजे ४० टक्के होय. तरीही जनतेने तो मोठ्या आनंदाने दिला.
याचे कारण म्हणजे शिवरायांनी दलालाची मधली फळी नेस्तनाबूत केली
रयतेचा कर रयतेसाठी वापरला.
कर्जाऊ दिलेल्या साहित्याची यथावकाश उत्पन्नानुसार वसुली केली.
सुलतानी अथवा अस्मानी संकट आलेले असल्यास शेतसारा माफ केला.
एवढेच नव्हे, तर दिलेले कर्जसुद्धा माफ करण्याचा दीलदारपणा महाराजांनी दाखविला.
वरील मजकूर १९ फेब्रुवारी २०१३ रोजी सकाळ वृत्तपत्रात प्रकाशित प्रा. संजय गायकवाड यांच्या लेखातील आहे.