सकाळ डिजिटल टीम
विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाच्या यशानंतर महाराष्ट्रातील तुळापूर गाव चर्चेत आलं आहे.
पुण्याहून तुळापूर गाव साधारणतः 40 किलोमीटर अंतरावर आहे.
येथे संगमेश्वराचं प्राचीन मंदिर असून, या मंदिराला धार्मिक महत्त्व असलेलं ठिकाण आहे.
'छावा' चित्रपटातील कलाकारांनी शूटिंगपूर्वी तुळापूरला भेट दिली होती.
तुळापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असून, त्या ठिकाणाला एक ऐतिहासिक महत्त्व आहे.
तुळापूर गाव भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेलं आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचे कवी मित्र, कवी कलश यांची समाधीही तुळापूरमध्ये आहे.
इतिहास आणि त्यागाची साक्ष देणाऱ्या या ठिकाणी भेट दिल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा संचारते.