रोहित कणसे
बऱ्याचदा आपण एखाद्या अडचणीत सापडलो की सर्व ठिक होईल असा दिलासा दिला जातो, बऱ्याचदा थोडं रडून घे तुला बरं वाटेल असंही सांगतात.
पण खरंच रडल्याने मन हलके होते का? याचे उत्तर हो अशेल तर त्यामागे नेमके कारण काय असते? हेच आपण जाणून घेणार आहोत.
तुमच्या रडण्याचे आरोग्य आणि मूडच्या बाबतीत अनेक फायदे आहेत. कारण माणसांच्या डोळ्यात तीन प्रकारचे अश्रू येतात.
पहिले अश्रू हे डोळे उघडझाप केल्याने येतात, यामुळे डोळ्यात ओलावा टिकून राहतो.
या अश्रूंना Basal Tears म्हणतात, दुसरे असतता Reflex Tears असतात जे डोळ्यांना हवा, धूर, धूळीच्या संपर्कात आल्याने डोळ्यात येतात.
याशिवाय व्यक्तीच्या डोळ्या आनंद, दुःख, निराशा या भावनांच्यावेळी देखील अश्रू चमकतात, ज्यांना Emotional Tears म्हणतात.
रडल्याने खरंच व्यक्तीचा मूड बरा होतो, तसेच रडल्याने भावना नियंत्रणात येतात आणि मानसिक तणाव देखील कमी होतो.
तज्ज्ञांच्या मते रडल्याने शरीरात ऑक्सीटोसिन आणि एंडार्फिन हॉर्मोन तयार गोतात जे शारीरिक आणि भावनिक वेदना कमी करतात.
टेन्शन आल्यावर रडल्याने अनेक स्ट्रेस हॉर्मोन निघून जातात, जे शरीरासाठी फायदेशीर आहे.
अश्रूंमध्ये Iysozyme नावाचे फ्लूइड असते ज्यामुळे रडल्याने डोळ्यातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होऊन डोळे साफ होतात.
या कारणांमुळे रडल्याने व्यक्तीला रिलॅक्स वाटू लागते आणि तणाव देखील कमी होतो.
रडल्याने शरीरातून असे केमिकल्स रिलीज गोतात ज्यामुळे व्यक्तीला चांगले वाटू लागते आणि मूड देखील ठीक होतो.
वाढदिवसाला केक कापण्यामागे काय आहे इतिहास?