Sandeep Shirguppe
जेवणात मीठ नसेल तर जेवण बेचव लागतं परंतु मीठाचे सेवन अतिप्रमाणात झाल्यास आयुष्यावर येऊ शकतं.
जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो, ज्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
मीठाचे प्रमाण जेवणात अधिक झाल्यास मूत्रपिंडावर ताण येतो आणि मूत्रपिंडाचे आजार होऊ शकतात.
मीठामुळे ॲसिडिटी वाढू शकते. यामुळे वरून मीठ खाऊ नये.
जास्त मीठ खाल्ल्याने हाडांमधील कॅल्शियम कमी होते आणि ऑस्टिओपोरोसिस सारखे आजार होऊ शकतात.
काही अभ्यासानुसार, जास्त मीठ खाल्ल्याने पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
डोकेदुखीचा वारंवार त्रास असेल तर मीठ खाणे टाळा.
मीठाच्या अती सेवनाने नैराश्य येऊ शकते. आपल्या शरीरावर याचा थेट परिणाम होतो.