कार्तिक पुजारी
अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दोन दिवसात आपला मार्ग स्पष्ट करणार असल्याचं ते म्हणालेत.
अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनी इंदिरा गांधी यांच्या संमतीने काँग्रेस फोडली होती
आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत लोकसभेत काँग्रेसचा दारुण पराभव झाला
यावेळी काँग्रेसला २८ जागा गमवाव्या लागल्या होत्या. पराभवाचं खापर राज्यातील नेत्यांनी शंकरराव चव्हाण यांच्यावर फोडलं होतं.
चव्हाण यांनी मनातील खदखद इंदिरा गांधी यांना बोलून दाखवली. यावेळी गांधींनी त्यांना नवा पक्ष स्थापन करण्याला परवानगी दिली होती.
शंकरराव चव्हाण यांनी महाराष्ट्र समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. पण, १९७८ मध्ये विधानसभेत त्यांचा पराभव झाला.
पुढे ते शरद पवारांच्या पुलोद सरकारमध्ये सामील झाले.
शंकरराव चव्हाणांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्यानंतर त्यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात आलं