स्वातंत्र्य संग्रामातील वीर; बलिदानाची अमर गाथा

Aarti Badade

भारताचा स्वातंत्र्यलढा : शौर्य, बलिदान आणि विजय

ब्रिटीश राजवटीपासून मुक्त होण्यासाठी भारताने जवळपास 200 वर्षे संघर्ष केला. 15 ऑगस्ट 1947 रोजी हा लढा विजयात संपला.

freedom fighters of india | Sakal

सुरुवात कशी झाली?

पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि शेवटी ब्रिटिश व्यापाऱ्यांनी भारतात प्रवेश केला. 1757 नंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे वर्चस्व वाढले.

freedom fighters of india | Sakal

1857 चे स्वातंत्र्यसमर

मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांसारख्या वीरांनी उठाव केला. जरी तो अपयशी ठरला तरी स्वातंत्र्याची ठिणगी पेटली.

freedom fighters of india | Sakal

वंगभंग आणि स्वदेशी चळवळ

1905 मध्ये बंगालची फाळणी झाली. याला विरोध म्हणून स्वदेशी चळवळ सुरू झाली. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यात आला.

freedom fighters of india | Sakal

लाल, बाल, पाल आणि इतर प्रेरणादायी नेते

लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपीनचंद्र पाल यांनी जनतेत स्वातंत्र्याची भावना जागवली. स्वामी विवेकानंद, भगिनी निवेदिता, दादाभाई नौरोजी यांचेही मोलाचे योगदान.

freedom fighters of india | Sakal

महात्मा गांधी आणि अहिंसक लढा

दांडी मार्च, असहकार चळवळ, मिठाचा सत्याग्रह यांच्या माध्यमातून गांधीजींनी अहिंसेचा मार्ग दाखवला.

freedom fighters of india | Sakal

क्रांतिकारकांचा लढा

भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी शौर्य आणि बलिदानाची अद्वितीय उदाहरणे घालून दिली.

freedom fighters of india | Sakal

1942 चे भारत छोडो आंदोलन

"करो या मरो" या घोषणेसह लाखो भारतीय रस्त्यावर उतरले. या आंदोलनाने ब्रिटिश साम्राज्याला हादरा दिला.

freedom fighters of india | Sakal

स्वातंत्र्यप्राप्ती

14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तानची निर्मिती झाली आणि 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र व सार्वभौम झाला. तिरंगा अभिमानाने फडकला.

freedom fighters of india | Sakal

स्मरण आणि प्रेरणा

स्वातंत्र्यलढा ही केवळ इतिहासाची गोष्ट नाही, तर प्रत्येक पिढीसाठी प्रेरणेचा स्रोत आहे. आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे.

freedom fighters of india | Sakal

15 ऑगस्टला भारतासोबतच 'हे' देशही साजरा करतात स्वातंत्र्यदिन

येथे क्लिक करा