बाजीराव आणि मस्तानीचा अंत कसा झाला ?

Vrushal Karmarkar

पहिले बाजीराव पेशवे कोण होते?

थोरले बाजीराव पेशवे, मराठा साम्राज्याचे महान पंतप्रधान! १७२० मध्ये त्यांना पेशवेपद मिळाले आणि त्यांनी अवघ्या भारताला आपल्या तलवारीच्या जोरावर हादरवले.

Bajirao | ESakal

जिंकलेल्या सर्व लढाया

आपल्या कारकीर्दीत बाजीरावांनी एकही लढाई न हरता मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार केला. त्यांचे नावच विजयाचे प्रतीक बनले.

Bajirao and Mastani | ESakal

मराठ्यांची घोडदौड नर्मदेपलीकडे

नर्मदा नदी ओलांडून मराठा साम्राज्याचा विस्तार करणारे पहिले सेनापती म्हणजे बाजीराव! त्यांनी स्वराज्याचे स्वप्न भारतभर पसरवले.

Bajirao and Mastani | ESakal

नासिरजंगवर विजय

२७ फेब्रुवारी १७४० रोजी बाजीरावांनी नासिरजंगविरुद्ध विजय मिळवला. मुंगीपैठण येथे तह झाला आणि हंडिया-खर्गोण मराठ्यांच्या ताब्यात आले.

Bajirao and Mastani | ESakal

पुण्यातील संकट: मस्तानीची कैद

त्यावेळी पुण्यात कुटुबियांनी बाजीरावांच्या प्रिय मस्तानीला कैदेत ठेवले होते. या घटनेमुळे बाजीरावांचे मन विषण्ण झाले.

Bajirao and Mastani | ESakal

अस्वस्थ मन आणि आजारपण

मस्तानीच्या वियोगातून मनःस्ताप झालेल्या बाजीरावांनी जहागिरीची व्यवस्था पाहण्यासाठी खर्गोणला प्रयाण केले, पण तेथे त्यांना तीव्र ज्वर झाला.

Bajirao and Mastani | ESakal

शेवटचा श्वास रावेरखेडी येथे

बाजीराव पेशव्यांनी २८ एप्रिल १७४० रोजी रावेरखेडी येथे जगाचा निरोप घेतला. त्यांचे वय अवघे ३९ वर्षे इतके होते.

Bajirao and Mastani | ESakal

काशीबाई आणि जनार्दनचा निरोप

बाजीरावांच्या मृत्यूसमयी त्यांची पत्नी काशीबाई व मुलगा जनार्दन उपस्थित होते. मस्तानी मात्र पुण्यातच अडचणीत होती.

Bajirao and Mastani | ESakal

मस्तानीचाही करुण अंत

बाजीरावांच्या मृत्यूची बातमी मिळताच मस्तानीनेही प्राणत्याग केला. विषप्राशन वा दु:खातून प्राणत्याग – यावर इतिहासात मतभेद आहेत.

Bajirao and Mastani | ESakal

समाधी स्थळे आजही जिवंत आठवणी

रावेरखेडी येथे बाजीरावांची समाधी तर पाबळ गावी मस्तानीची कबर आजही त्या अमर प्रेमकथेची साक्ष देते.

Bajirao and Mastani | ESakal