Vrushal Karmarkar
१७ मे १६१२ रोजी शाहजहानने मुमताज महलशी लग्न केले. त्यानंतर १९ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात मुमताज महल अनेक वेळा गर्भवती राहिली. एकामागून एक १४ मुलांना जन्म दिला.
लग्नानंतर मुमताजला १० मुले झाली. तिच्या १० व्या मुलाच्या जन्मात आणि ११ व्या मुलाच्या जन्मात पाच वर्षांचे अंतर होते. १६२७ मध्ये मुमताज १२ व्यांदा गर्भवती राहिली.
त्यानंतर दोन वर्षांनी तिने १३ व्या मुलाला जन्म दिला. १६३१ मध्ये १४ व्या मुलाला जन्म दिला. मात्र यावेळी एक अघटीत घटना घडली. यानं मुघल साम्राज्याला धक्का बसला.
मुमताज महलच्या मुलांपैकी आठ मुले आणि सहा मुली होत्या. त्यापैकी फक्त सातच वाचले. मुमताज महलने तिच्या चौदाव्या अपत्याच्या रूपात एका मुलीला जन्म दिला.
शाहजहान कोणत्याही किंमतीत मुमताजपासून दूर राहू इच्छित नव्हता. तेव्हाच मुमताज मुलाला जन्म देणार असताना दक्षिणेत बंड झाले होते.बंड दडपण्यासाठी शाहजहानला बुरहानपूरला जावे लागले.
बाळंतपणाची वेळ जवळ आली असूनही शाहजहानने गर्भवती मुमताजला आग्र्यापासून ७८७ किलोमीटर अंतरावर सोबत घेतले. एवढा प्रवास करत तो मुमताजसोबत बुरहानपूरला पोहोचला.
इतक्या लांब प्रवासाचा परिणाम असा झाला की मुमताज खूप थकली. या प्रवासाचा आणि थकव्याचा तिच्या गर्भाशयावरही परिणाम झाला आणि समस्या सुरू झाल्या.
अखेर १६ जून १६३१ च्या रात्री मुमताजला प्रसूती वेदना सुरू झाल्या. एकीकडे मुमताज महाल वेदनेने त्रस्त होती आणि दुसरीकडे दक्षिणेतील बंड संपवल्यानंतर शाहजहान पुढील रणनीती आखत होता.
जेव्हा त्याला मुमताजच्या प्रकृतीची माहिती मिळाली तेव्हा त्याने स्वतः तिच्याकडे जाण्याऐवजी सुईणी पाठवण्याचा आदेश दिला. मुमताजने सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत वेदना सहन केल्या.
त्यानंतर ३० तासांच्या वेदनांनंतर तिने एका मुलीला जन्म दिला. जिचे नाव गौहर आरा आहे. त्यानंतरही, मुमताजची प्रकृती सुधारण्याऐवजी बिघडू लागली.
ती खूप थरथर कापत होती आणि तिच्या पायांना थंडी वाजत होती. तिला खूप रक्तस्त्राव होत होता. दुसरीकडे शाहजहानने मुमताजकडे वारंवार संदेश पाठवले. पण कोणीही परतले नाही.
मध्यरात्रीपेक्षा जास्त वेळ उलटून गेल्यानंतर शाहजहानने स्वतः मुमताजकडे हरममध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याला संदेश मिळाला की बेगम आता ठीक आहे. पण खूप थकली आहे.
बाळाच्या जन्मानंतर मुमताज गाढ झोपेत आहे. तिला त्रास देऊ नये, हे ऐकल्यावर शाहजहान झोपी गेला. त्यानंतर शाहजहानची मोठी मुलगी जहाँआरा तिथे पोहोचली. आईची प्रकृती बिघडत असल्याचे सांगितले.
शाहजहानने हरममध्ये धाव घेतली. जिथे मुमताजसमोर अनेक वैद्य होते. मुमताजला खूप वेदना होत होत्या. शाहजहानला पाहून शाही वैद्य वगळता सर्वजण बाहेर पडले.
शाहजहानचा आवाज ऐकून बेगमने डोळे उघडले आणि ते अश्रूंनी भरले. शाहजहान तिच्या डोक्याजवळ बसला आणि १७ जून १६३१ मध्ये मुमताज त्याच्या मांडीवर मरण पावली.
मुमताजच्या मृत्यूनंतर तिच्या १४ मुलांचं काय झालं? औरंगजेबानं किती मुलांना मारलं?