Anuradha Vipat
कर्जापासून मुक्तता हवी असेल तर शुक्ल पक्षाच्या बुधवारपासून गणेश स्तोत्राचे नियमित पठण करा.
यामुळे कर्जातून लवकर सुटका होऊ शकते.
तसेच आपल्या घराच्या ईशान्य दिशेकडील जागा स्वच्छ ठेवा.
त्यामुळे वास्तू दोष दूर होतो आणि कर्जमुक्ती होण्यास मदत होते.
बुधवारी मूग उकडावे आणि त्यात साखर, तूप मिसळून गाईला खाऊ घालावे. यामुळेही कर्जातून लवकर मुक्ती होते
रात्री झोपताना डोक्याजवळ एका भांड्यामध्ये गहू भरून ठेवा आणि सकाळी उठल्यावर आंघोळ करून ते गहू कोणत्याही गरजू व्यक्तीला दान करा
मंगळवारी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाचा दूध आणि पाण्याने अभिषेक करा.